
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगांव शहरवासियांना दररोज पिण्यांसाठी पाणी मिळाले पाहिजे त्यासाठी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे शिर्डी कोपरगांव अशी २६० कोटी रूपये खर्चाची पिण्यांच्या पाण्यांची योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुर करून ठेवलेली आहे तर दुसरीकडे पाचव्या साठवण तळयात पाणी घेतांना निळवंडेच्या पाण्यांवरील हक्क सोडावा अशी जाचक अट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घातली होती तेंव्हा कोपरगांवशहरवासियांना अशा अटी घालुन त्यांना त्यांच्य न्याय हक्कापासून वंचित ठेवु नये कोपरगांव शहरवासियांना दारणेचे आणि निळवंडेचे असे दोन्ही ठिकाणहुन पिण्यांसाठी पाणी मिळालेच पाहिजे, त्याचे सध्याचे मंजुर असलेले आरक्षण कायम ठेवावे अशा आशयाचे निवेदन यांनी उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी भाजपाचे गटनेते रविंद्र पाठक व शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल यांनी दिले.विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे हे बुधवारी कोपरगांव तालुका दौ-यावर आले असता त्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव शहराला सध्या ८ तर उन्हाळ्यात १५ ते २० दिवसाआड पाणी मिळते ते दररोज शुध्दरित्या मिळावे म्हणून आम्ही सातत्यांने भूमिका घेवुन त्याबाबत ठोस पावले उचलुन कार्यवाही करत आहोत, कोपरगाव शहरवासीयांच्या पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे शिर्डी कोपरगाव अशी बंदिस्त पाईपलाईन योजना मंजूर करून आणली, त्याचे काम साईबाबा संस्थान शिर्डी करणार आहेत या याजनेसाठी भरावा लागणारा पुर्नस्थापना खर्चही माफ करण्यात आलेला आहे, आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कोपरगाव नगरपरिषदेवर या योजनेचा आर्थिक बोजा पडणार नाही., तसेच शासनालाही यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत कोपरगाव शहराच्या प्रस्तावित पाचव्या वाढीव साठवण तलावास महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, नाशिक यांचेकडून तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे., त्यासाठीचे पाणी आरक्षण नाही मंजूर झालेले आहे, या दोन्ही योजनेमुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटण्यास निश्चित मदत होणार आहे. परंतु पाचव्या साठवण तलावास मंजुरी देतानी निळवंडे धरणावर कोपरगाव शहराकरिता मंजूर असलेले पाणी आरक्षण रदद करण्याची अट टाकलेली आहे, कोपरगाव शहरवासियांची पिण्याचे पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शहराकरिता मंजूर असलेले निळवंडे व दारणा समूहावरील पाणी आरक्षण कायम ठेवण्यात यावे याबाबत संबंधित यंत्रणेस मागणी करून पालिकेच्या नुकताच झालेल्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव पारित करण्यात आला आहे, तेव्हा हे दोन्ही ठिकाणचे पाण्याचे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, तसेच कोपरगांव शहराकरिता सन २०१३ मध्ये केंद्रशासनाच्या UIDSSMT अंतर्गत ४२ कोटीची पाणीपुरवठा योजनेची, जलशुद्धीकरण केंद्र, वितरकांची चाचणी न घेताच संबंधित एजन्सीला पूर्ण बीले अदा केलेली आहेत तेव्हा यातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे आम्ही यापूर्वीच लेखी स्वरूपात मागणी केलेली आहे. तेव्हा विभागीय आयुक्तांनी यु आय डी एस एस एम टी योजनेची तात्काळ चाचणी करून शहरास पुर्ण क्षमतेने सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी संबंधित यंत्रणेस आदेश करावेत, तसेच शहरासाठी मंजुर असलेले निळवंडे व दारणा धरणावरील पाण्याचे आरक्षण कायम ठेवावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर बोलताना आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांनी निळवंडे-शिर्डी-कोपरगाव बंधिस्त पाईपलाईन योजनेवर लक्ष वेधून या योजनेच्या कामास गती देऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.


