
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहराला पाणी पुरवठा होत असताना शहरातील वितरण व्यवस्थेत गळती असून मोठया प्रमाणात पाणी वाया जाते मात्र या पाणी गळतीच्या हिशोबाला मोठी गळती असल्याची शक्यता आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते व लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे
कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गंभीर आहे मात्र साठवण तलाव आणि वितरण व्यवस्थेतील दोष दूर झाल्यास मोठ्या प्रमाणावर पाणी बचत होऊ शकते मात्र या बाबत अनेक घोषणा झाल्या मात्र कोणताही दोष दुरुस्त झाला नाही
नळ कनेक्शन बसवणे, दुरुस्ती साठी नागरिक रीतसर नगर पालिकेला पैसे भरतात, रस्ते खोदाई व त्याच्या दुरुस्तीचा खर्च नागरिकांकडून वसूल केला जातो मात्र ना नगर पालिके कडून ना नळ दुरुस्त होतो ना खड्डे बुजवले जातात नागरिकांकडून पैसे वसूल करून देखील नगर पालिका नळासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त करत नाही त्याचा विनाकारण मनस्ताप जनतेला सहन करावा लागतो तर आधीच खड्डे असलेल्या रस्ता पुन्हा खड्डा होतो त्यामुळे दि २०जुलै २०२१ रोजी अँड.नितीन पोळ यांनी माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी प्रमाणे अर्ज देऊन सन २०१४ ते जून २०२१ अखेर कोपरगाव शहरातील नळ दुरुस्ती च्या खर्चाची माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी प्रमाणे माहिती विचारली मात्र एक महिन्याचा कालावधी संपला तरी नगर पालिकेच्या सक्षम विभागाने या अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही म्हणून दि २०/९/२०२१ रोजी पुन्हा प्रथम अपील दाखल केले मात्र त्या अपिलाचा वेळ संपला तरी देखील नगर पालिकेच्या अपिलीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही सदर कालावधी संपलेला असताना दि १५/११/२०२१ रोजी नगर अपिलाच्या सूनवणीची नोटीस तयार करून दि २३/११/२०२१ रोजी सुनावणीची वेळ १२:३० मिनिटांची नमूद केलेली असताना अर्जदारास सदर नोटीस १:१० मी दिली सदर नोटीस वेळेत बजावली नसल्याने पुन्हा पुढील नोटीस ६/१२/२०२१ रोजी देऊन १४/१२/२०२१ तारीख नेमली मात्र त्या दिवशी देखील सुनावणी न घेता माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे यावरून नगर पालिकेच्या नळ गळतीच्या हिशोबात मोठी गळती असून माहिती वेळेत दिली नाही म्हणून लवकरच राज्य माहिती आयोग यांच्या कडे अपील दाखल करण्यात येईल असे या पत्रकात म्हटले आहे


