
कोपरगाव प्रतिनिधी
शुरांचे चरित्र वाचून स्फूर्ती मिळते. साधूंचे चरित्र आचरण कसे असावे हे शिकवते तर भगवंताचे चरित्र वाचल्यास अंतरंगाला आनंद आणि समाधान मिळते असे प्रतिपादन ह .भ .प .शिवाजी महाराज भालुरकर यांनी केले .कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे गेली अनेक वर्षांपासून दत्तजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते . सदर कार्यक्रमाची सुरुवात ब्रम्हलीन नारायण गिरी महाराजांच्या हस्ते सुरुवात केलेली आहे . यावेळी ते अभंगाचे विवेचन करताना म्हणाले की विष्णू व महेश या तीन देवतांचे ते प्रतीक आहेत. म्हणजेच सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीनीही गुणांचा एकाच ठिकाणी वास आहे. आणि म्हणून विष्णूला मानणारे, ब्रम्ह देवाला मानणारे व महादेवाला मानणारे असे सर्व भक्त दत्तात्रयाच्या ठिकाणी नतमस्तक होतात म्हणून दत्त मंदिर सर्व शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळते.जगात नारी शक्ती सर्वात श्रेष्ठ आहे .अनसूयेने ब्रम्ह ,विष्णु, महेश या तीनही ब्रम्हांड निर्माण करणाऱ्या देवांना एका क्षणात लहान बालकं केली होती .त्या शापातून मुक्त करण्यासाठी तीन शीर असलेला भगवान दत्तात्रय यांचा अवतार झाला .हा अवतार फक्त विश्वला तारण्यासाठी झालेला आहे. यावेळी निरुपणासाठी “विश्व तारावया धरी अवतार”हा संत एकनाथ महाराजांचा अभंग घेतला होता .
कीर्तन प्रसंगी संगीत साथ शिवाजी ठाकरे , पावडे महाराज, वसंत भाकरे ,दत्तात्रय शिनगर आदींनी केली तर प्रकाश सांगळे व राजेंद्र सांगळे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते .यावेळी मोठया प्रमाणावर परिसरातील भाविक उपस्थित होते.


