
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक शेतात सोडले शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिसकला गेला आणी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले
जेऊर कुंभारी,चांदेकसारे डाऊच खुर्द भागात पावसाने शेतकऱ्यांचे सगळ्यात जास्त नुकसान झाले.
जेऊर कुंभारी गावात घरांचे नुकसान झाले जनावरे दगावली त्यानंतर पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. व
मोठ्या प्रमाणात पंचनाम्यांची कागदोपत्रीच रंगवण्यात आली. परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला गेला नाही शेतकऱ्यांना पंचनामेचे एकही रूपया मिळाला नाही.
शासनाने शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याला अनेक संकटाला सामोरे जावे लागते संकट हे शेतकऱ्याची पाठ सोडायला तयार नाही.आस्मानी सुलतानी संकट शेतकऱ्यांसमोर कायमस्वरूपी उभे आहे .
याबरोबरच दिवसेंन दिवस वाढत्या खतांच्या किमती व औषध फवारणीचा खर्च, मशागतीचे वाढते दर तसेच महावितरणाचा विज बिल तगादा खर्च जास्त व शेतमालाला भावन मिळाल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे तरी शासनाने लवकरात लवकर केलेल्या पंचनाम्याचा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी जेऊर कुंभारीचे माजी सरपंच यशवंत आव्हाड यांनी केली.


