Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगांवची जनता त्रासलेली पण लोकप्रतिनिधी जेसीबीद्वारे गुलाल उधळण्यांत मशगुल!!-स्नेहलता कोल्हे.

कोपरगांवची जनता त्रासलेली पण लोकप्रतिनिधी जेसीबीद्वारे गुलाल उधळण्यांत मशगुल!!-स्नेहलता कोल्हे.

कोपरगाव प्रतिनिधी

            गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे आर्थीक परिस्थिती हातघाईला आली आहे. गोर-गरीबांच्या हाताला काम नाही, शेतकरी पीक नुकसानीमुळे त्रस्त आहे. गोदावरी कालव्यांच्या रब्बी पाटपाणी आर्वतनाचा खेळखंडोबा झाला आहे, कष्टकरी एस टी कर्मचारी हवालदिल आहे, मतदार संघातील सर्वसामान्यांची किरकोळ कामे होत नाही, रेशनकार्ड, डोल, आपत्तीग्रस्त, दिव्यांग आदि शासकीय योजना लाभार्थ्यांच्या प्रश्नांना कुणींही वाली राहिलेले नाही अशा परिस्थितीत कोपरगांवचे लोकप्रतिनिधी जेसीबीद्वारे गुलाल उधळण्यांत मशगुल आहे तर महाविकास आघाडीचे सरकार जनतेला नागवत आहे अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगांव व राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या बेसुमार कामगिरीचा समाचार घेतला.
तालुक्यातील जेउरकुंभारी येथील संजयनगर व जेउरगांव दोन समाज मंदिरे २० लाख, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सडक योजनेअंतर्गत जेउरफाटा ते जेउरगांव रस्ता डांबरीकरण ८० लाख ४५ हजार, पवारवस्ती अंतर्गत रस्ता कॉकीटीकरण ५ लाख, चांदेकसारे रोड ते हरिसन बॅच रस्ता डांबरीकरण १९ लाख या विकास कामांचे लोकार्पण तर संजयनगर ते पांढरे वस्ती रस्ता डांबरीकरण १० लाख, जेउर ते डाउच शिवरस्ता डांबरीकरण १० लाख, संजयनगर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते काकडेबाबा घर रस्ता कॉकीटीकरण ५ लाख तर गणपती मंदिर व आंबेडकर पुतळा मैदानात पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख या कामांचे भूमिपुजने भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते मंगळवारी झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात होते.प्रारंभी उपसरपंच जालींदर चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सरपंच सौ. सुवर्णा सतिष पवार यांनी प्रास्तविक केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते यांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जेउरकुंभारी गाव दत्तक घेवून विकासाच्या कुठल्या योजना मार्गी लावल्या याची माहिती दिली. माजी सभापती शिवाजीराव वक्ते यांनी जेउरकुंभारी गांवच्या पिण्यांच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असुन त्यासाठी जागा हस्तांतरणातील त्रुटींची पुर्तता ग्रामपंचायत स्तरावर पुर्ण करून दिली आहे. रिपाईचे राज्य सचिव दिपक गायकवाड म्हणाले , आमदारांनी जेउरकुंभारी गावच्या पिण्यांच्या पाणी योजनेबाबत दिशाभूल करू नये, आतापर्यंत ते ज्या ज्या कामाचे लोकार्पण करत आहे त्याचा सर्वस्वी पाठपुरावा हा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांचाच आहे.याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे संचालक अरूण येवले, मधुकरराव वक्ते, केशव होन, विठठलराव आव्हाड, सतिष आव्हाड, रमेश वक्ते, शिवाजी यादवराव वक्ते, नितीन इंगळे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री यशवंत आव्हाड, ताराचंद लकारे, अनिता वक्ते, गंगुबाई जाधव, वैशाली भोंगळे, ग्रामविकास अधिकारी के बी रणछोड, दादासाहेब चव्हाण, गोरख चव्हाण, संजय वक्ते, भाउसाहेब वक्ते, सतिष पवार, तुळशीदास वक्ते, कोंडीराम वक्ते, नारायण गुरसळ, किशोर गायकवाड, किरण गायकवाड, आनंदा चव्हाण, अशोक राउत, गिरधर गुरसळ, किरण वक्ते, सुधाकर वक्ते, कैलास चव्हाण, आप्पा शहाजी वक्ते, मार्तंड जाधव, आनंद बारसे, पंकज पुंगळ, शामराव वक्ते, लक्ष्मणराव वक्ते, राजेंद्र जगताप, मथुराबाई वक्ते यांच्यासह पंचकोशीतील विविध संस्थांचे आजी माजी प्रतिनिधी, नागरिक, महिला बचतगटाच्या भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या विकासाच्या आदर्शावर गेल्या पाच वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाकडुन शहर व ग्रामिण भागातील व कोपरगांव मतदार संघातील विकासाचे रस्ते, आरोग्य, वीज, पाटपाणी आदि प्रश्नांची सोडवणुक करून सर्वसामान्य मतदारांच्या प्रश्नांना न्याय देण्यांचे काम केले आहे. कार्यकर्त्याची उर्जा नेत्याला घडवत असते, त्याचे प्रामाणिक मत चुकले तर त्याची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागते. पर्जन्यमान बरे आहे, विहीरींना पाणी आहे, अति पावसामुळे खरीपाची वाट लागली, रब्बी पीक नियोजनासाठी शेतकरी पत्नीचे दागिने गहाण ठेवुन काबाडकष्ट करत आहे मात्र महाविकास आघाडी शासन, उर्जामंत्री आणि येथील लोकप्रतिनिधी.  शेतक-यांची वीज कापली जात असतांना त्याबददल चकार शब्द काढायला तयार नाही, असंख्य वीज रोहित्र जळालेले आहेत. गांवोगावच्या पिण्यांच्या पाणी योजनांची वाताहात झाली आहे. बील वसुलीसाठी रोहित्र बंद ठेवुन शेतक-यांना त्रास देण्यांची भूमिका तीन तिघाडे सरकार घेत आहे. कोरोनाच्या संकटातुन येथील सर्वसामान्य अजुनही बरा झालेला नाही पण त्याच्यावर अन्यायाचे फटकारे मारून महाविकास आघाडी शासन वसुलीत मशगुल आहे, लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही, मतदार संघातील रस्त्यांची वाट लागली आहे, विकासाचा डांगोरा पिटला जातो, महाविकास आघाडी शासनाने प्रस्तावित विकास कामे थांबऊन कोपरगाव विधानसभा मतदारसंघ आवरलं नाही करत आहे अशी टिकाही कोल्हे यांनी केली. शेवटी शिवाजी यादवराव वक्ते यांनी आभार मानले. सुत्रसंचलन  प्रदिप दिपक गायकवाड यांनी केले. तालुक्यातील जेउरकुंभारी येथील १ कोटी ५४ लाख रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपुजने भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते मंगळवारी झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!