
कोपरगाव प्रतिनिधी
समृद्धी महामार्गाचे कामाचा ठेका घेतलेल्या गायत्री कंट्रक्शन कंपनीने चांदेकसारे गावत मनमानी कारभार सुरूच आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या मालमत्तेचे व पिकांचे नुकसान होत आहे वारंवार तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चांदेकसारे येथील पीडित शेतकऱ्यांनी कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे यांना गायत्री कंपनीच्या मनमानी कारभाराला आळा घालून या संकटातून मुक्त करावे असे निवेद दिले आहे.
यावेळी रावसाहेब रामजी होन भास्कर होन, किशोर होन, पंकज पुंगळ,बाळासाहेब होन,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की श्री रावसाहेब रामजी होन हे चांदेकसारे गावाचे रहीवासी असुनकोपरगाव संगमनेर रस्त्या लगत सर्वे नंबर 5 मध्ये त्यांचे वडिलोपार्जित क्षेत्र आहे त्या क्षेत्रातून संमृद्धी महामार्गाचा कामाचा ठेका घेतलेल्या गायत्री कंपनी नेपुर्व परवानगीशिवाय गेल्या दोन वर्षापासून अवजड वाहनांची वाहतूक सुरू केली आहे त्या मुळे आजूबाजूच्या घरांना भेगा पडून नुकसान झाले आहे. त्याबरोबरच जनावरांचा चारा तसेच शेतमालाचेही नुकसान होत आहे उडणाऱ्या धुळी आमच्या कुटुंबाला श्वसनाचे विकार झाले आहेत. यासंदर्भात आम्ही वारंवार गायत्री कंपनी ला सांगूनही अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे.कंपनीचे अधिकारी कुणालाही घाबरत नाही असे त्यांच्या वर्तणुकीत दिसुन येते आहे तरी साहेबांनी हे सर्व कुणाच्या कृपा आर्शिवादाने सुरू आहे कुणीतरी आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त होत असुन अशी चांदेकसारे पंचक्रोशीतच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तरी त्यांना कोणी कितीही पाठिंबा दिला तरी आम्ही याविषयी गप्प बसणार नाही कारण आमच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी माननीय साहेबांनी निवेदनाचा सहानुभूती पूर्वक विचार करून गायत्री कंपनीचा मनमानी कारभार आळा घालून आम्हाला या संकटातून मुक्त करावे अशी विनंती चांदेकसारे ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात केली आहे.


