Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedमागेल त्याला शेततळे’ योजनेच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न मार्गी!!- आ.आशुतोष काळे

मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न मार्गी!!- आ.आशुतोष काळे

      कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाअंतर्गत असलेल्या शेततळे योजनेचे अनुदान रखडले होते. याबाबत  मागील आठवड्यात कृषिमंत्री ना.दादा भुसे यांची भेट घेऊन  रखडलेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी केली होती. त्या मागणीचा कृषी विभागाने सकारात्मक विचार करून ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेसाठी ५२.५० कोटी निधी राज्यासाठी मंजूर केला आहे. या निधीतून कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे अनुदान प्रलंबित होते अशा शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळणार असून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
          शासनाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविली जात असून अनेक शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होत असतात. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता. बहुतांशी शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळालेले होते. मात्र २०१९-२० या वर्षातील ६९ लाभार्थी शेततळ्याच्या अनुदानापासून वंचित होते. या शेतकऱ्यांना रखडलेले अनुदान मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यासाठी राज्याचे कृषीमंत्री ना. दादा भुसे यांची भेट देखील घेवून शेतकऱ्यांच्या अडचणी मांडून रखडलेले अनुदान तातडीने मिळावे अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली होती. त्या मागणीची कृषी विभागाने दखल घेवून सन २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी संपूर्ण राज्याला ५२.५० कोटी निधी मंजूर केला आहे. या निधीतून २०१७, २०१८, २०१९ व २०२०-२१ मध्ये पूर्ण झालेल्या शेततळ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील ६९ लाभार्थी शेतकऱ्यांचे जवळपास ३३ लाख ७६ हजार एवढी बाकी असलेली रक्कम मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांपुढील आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असून अनेक संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेले अनेक  प्रश्न तातडीने सोडविले जात आहे. शेततळ्याच्या अनुदानाचा देखील प्रश्न सरकारने सोडविल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!