
कोपरगाव प्रतिनिधी
मागील काही दशका पासुन नगर जिल्हा चा कॅलिफोर्निया म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या कोपरगावची बाजारपेठ अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी नागरीकांचे मुलभुत प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.
कोपरगावची बाजारपेठ व अर्थव्यवस्था शेजारील संगमनेर तालुक्यासारखी फुलली पाहीजे व तालुक्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यायच असेल तर शहराचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी येत्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कोपरगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोपरगावातील व्यापारी व तरुणांनी सक्रिय होऊन पुढाकार घेणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते आकाश नागरे यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले कि
कोपरगावची बाजारपेठ पूर्वीपासूनच व्यापाराच्या दृष्टीने नावाजलेली होती,परंतु गेल्या काही दशकांपासून विस्थापित टपरीधारक व्यापाऱ्यांचे प्रश्न रखडले आहेत,शहरातील रस्ते विज,पाणी हे प्रश्न प्रलंबित आहे निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे दळण वळणा वर परिणाम झाल्याने अर्थातच त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसला त्यामुळे बाजारपेठ रसातळाला जात आहे.त्यामुळे अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या उपाययोजना नाहीत,हरीत कोपरगावच्या घोषणा कागदावरच राहील्या आहेत.अश्या अनेक बाबींमुळे लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणाला जनता उबली आहे.
आपल्या बाजूच्या संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यात नागरिकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागल्याने बाजारपेठ मजबूत झाली आहे आणि मोठ्या प्रमाणवर अर्थव्यवहार सुरळीत सुरू आहेत. कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्याला व ग्राहकांना खरेदी विक्रीसाठी इतर ठिकाणी जावं लागतं ही शोकांतिका आहे आणि हे चित्र बदलण्यासाठी शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची आवश्यकता असुन त्यासाठी
येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व नामदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहराला पाणी, रस्ते, वीज, उत्तम आरोग्य व्यवस्था निर्माण करून शहराची बाजारपेठ व अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी व्यापाऱ्यांनी व तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन आकाश नागरे यांनी यावेळी केले
तसेच लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणाला कंटाळुन नुकत्याच पार पडलेल्या कोपरगाव येथील काँग्रेस पक्ष मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला व शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.लवकरच कोपरगाव शहरातील प्रत्येक
वॉर्डात काँग्रेस सभासद नोंदणी अभियान राबविणार आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार आहे.
आगामी काळात कोपरगावच विकासाचा मॉडेल हे संगमनेर व श्रीरामपूर सारखं नावलौकिक प्राप्त झालेल पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती ही तरुणांच्या कौशल्यात व व्यापाऱ्यांच्या अनुभवी मार्गदर्शनातूनच मिळू शकेल असे मत आकाश नागरे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात मांडले आहे.


