Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंवत्सरचे सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ डहाळेंनी लिहीले १२२ दिवसात हस्तलिखीत दासबोध.

संवत्सरचे सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ डहाळेंनी लिहीले १२२ दिवसात हस्तलिखीत दासबोध.

 कोपरगाव प्रतिनिधी

           तालुक्यातील संवत्सर येथील सेवानिवृत्त रयत शिक्षक रंगनाथ किसन डहाळे सर यांनी १२२ दिवसात हस्तलिखीत दासबोध लिहीले असुन त्याची प्रत नुकतीच सज्जनगड रामदास स्वामी चरणी पुजन केले आहे. श्री. रंगनाथ डहाळे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा नंतर आता दासबोधाचे हस्तलेखन पार पाडले आहे. ते संध्या नेवासे येथे वास्तव्य करतात.श्री. रंगनाथ किसन डहाळे सर हे कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांचे शिष्य आहे. कोरोना लॉकडाऊन काळाचा त्यांनी चांगल्याप्रकारे सदूपयोग केला आहे. कोकमठाण रामदासीबाबा भक्त मंडळ आणि सेवानिवृत्त प्राचार्य स्व. अशोकराव शिंदे यांच्याकडून प्रेरणा घेत त्यांनी धार्मिक ग्रंथ हस्तलेखन सुरु केले. त्यांनी अगोदर ज्ञानेश्वरी नंतर तुकाराम गाथा पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १ मार्च २०२१ रोजी दासबोध लिहायला घेतले, ते त्यांनी १२२ दिवसात ३० जून २०११ रोजी पूर्ण केले आहे. कर्जत तालुक्यातील खातगाव येथील समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांच्याकडून त्यांनी यावर मार्गदर्शन घेतले. नित्यसेवा, उपासना, गुरूचा ध्यास आणि धार्मिक लिखाण यामुळे मनुष्याच्यi विचाराची दिशा पूर्णपणे बदलून जाते याचा प्रत्यय त्यांना स्वतःला आला आहे. श्री. रंगनाथ डहाळे यांनी ब्रम्हलिन संत रामदासीबाबा उर्फ शंकर हरिभाऊ कोल्हटकर यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून त्यांच्या प्रत्येक स्थानावर जात माहितीचे संकलन पूर्ण करून त्याबाबतचे दाखले मिळवत त्यावर कृष्णा गोदाकाठचे योगी, तीन खणीचा रामानुभव आणि रामदासीबाबा समर्थविचारधारा या तीन पुस्तकाचे लेखन पुर्ण करून त्याचे महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते प्रकाशन केले आहे. त्यानंतर त्यांनी संत नरहरी महाराजांचे चरित्र पुस्तक प्रकाशित केले आहे. त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील सागरानंद महाराज पुस्तकाचे ते सध्या लेखन करत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आहे. कोपरगाव तालुका ऐतिहासिक माहिती मुख्य केंद्रस्थान असून संत महंत रामायण काळातील प्रसंग घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत, दक्षिण काशी म्हणून गोदावरी नदीला मानाचे स्थान आहे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थक्षेत्र साईबाबांची शिर्डी कोपरगाव पासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर आहे. देश-विदेशातील भाविक याठिकाणी येऊन नतमस्तक होतात आणि कोपरगाव तालुक्याच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असतात. कोकमठानच्या ब्रह्मलीन संत रामदासी बाबा यांचा इतिहास पुढच्या पिढीला माहिती व्हावा या उददेशांनी त्यांनी तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत. तीनखणीचा रामानुभव हे पुस्तक सध्या समाजमाध्यमांवर उपलब्ध असून दररोज त्यावर वाचक आपापली मते व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!