
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील हरिसन ब्रँच चारी
नावाने प्रचलित असलेल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या उपवितरीकेचे अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.गेल्या वर्षापासून पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे चारी मध्ये गवताचे साम्राज्य,तसेच दोन्ही कडेला काटेरी झुडपे झाल्याने एक काळ या परीसराची जिवन वाहीनी असलेली हिच का ती हरिसन ब्राॅच चारी असा प्रश्न पडतो आहे
या चारीतुन गोदावरी उजव्या कालव्यातून शेतीसाठी तसेच पिण्यासाठी आर्वतने दिली जातात परंतु पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे
ती आता नामशेष होण्याच्या मार्ग वर आहे.
आता पाटबंधारे विभागाने रब्बीचे अवतरण घोषित केल्याचे ऐकवित आहे त्या अनुषंगाने परीसरातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरले आहे.परंतु चारीची हि अवस्था पाहता शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळेल की नाही अशी शंका उपस्थित झाली आहे कारण त्यात वाढलेल्या गवतामुळे व काटेरी झुडपामुळे तिची वहन क्षमता कमी झाली आहे यापूर्वी रोटेशन येण्या अगोदर जेसीबीच्या साह्याने चारीची दुरुस्ती केली जात होती त्यामुळे शेतकरी वर्गाला पूर्ण क्षमतेने पाणी मिळत होते. पण आता पाटबंधारे विभागाने याकडे कानाडोळा केला आहे.
या पार्श्वभूमीवर जेऊर कुंभारी येथील आमदार आशुतोष काळे मित्र मंडळाने पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारा विरोधात कंबर कसली असुन हरिसन बँच चारीची तातडीने दुरूस्ती व्हावीयासाठी उपविभागीय अभियांता राहता यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वक्ते गोदावरी खोरे चे ट्रान्सपोर्ट कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते रोहिदास होन
पाटीलबा वक्ते, कल्याणराव गुरसळ, बापुराव वक्ते, किरण वक्ते, महेंद्र वक्ते बनसोडे भाऊसाहेब दत्तात्रय गोरडे आदी उपस्थित होते.


