
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जोगेश्वी इंटरनॅशनल स्कूल चे सचिव सुनिल होन यांनी नागरिकांनी आव्हान केले आहे. कोरोनाची लढाई संपली नाही नागरिकांनी स्व:ताची व कुटुंबाची काळजी घेतली पाहीजे असे आव्हान केले.
मागील दोन वर्षांच्या तुलनेत बाजारपेठेत चांगली गर्दी दिसत आहे, कोरोना च्या नियमावली चे काटेकोर पालन करत सर्व च नागरिक व व्यापारी बंधू नी मागील दोन वर्षे कडक नियमाचे पालन केले. पंरतु यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव कमी असल्याचे जाणवत असल्याने प्रशासनाने बाजार पेठ सुरू केल्या आहेत. त्या मुळे या वेळी ची दिवाळी सर्व व्यापारी वर्गा साठी तेजीत दिसुन येते. पंरतु बाजार पेठेत फिरतानां आपण अजूनही काळजी घेण्याची गरज आहे कारण कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला आहे कोरोना समुळ नष्ट झालेला नाही याची जाणीव आपण ठेवण्याची गरज आहे. आपण आजही नियमाचे पालन करावे व मास्क व सॅनिटाइजर चा वापर करावा.कोरोनाशी लढाई संपलेली नाही. सर्वानी काळजी घ्यावी व दिवाळी नंतर ही कोपरगांव तालुक्यात एकही रूग्ण असणार नाही म्हणजे खरी दिवाळी साजरी असे प्रतिपादन जोगेश्वी इंटरनॅशनलचे सचिव सुनिल होन यांनी व्यक्त केले.


