कोपरगाव प्रतिनिधी
मुलं ही आई वडिलांचा आरसा असतात अस म्हणतात. जेवढ्या चिकाटीने आई वडील आपल्या मुलांना शिकवतात तेवढ्याच प्रामाणिक पणे मुलांनी कष्ट केले तर यश नक्कीच मिळते हे यशाचं सूत्र आपल्याला नवीन नाही. श्री. कैलास थोरात व सौ. संगिता थोरात, रा. पंचाळे, ता. सिन्नर. यांनी आपली मुलगी पुजा हिस उच्च प्रतीचे शिक्षण दिले व मुलीचे लग्न करून दिले. आपण शिक्षण घेतले आहे तर त्याचा उपयोग व्हायला हवा, त्याचप्रमाणे कार्यरत महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे या ध्येयातून मुलीने लग्नानंतर अभ्यास चालू ठेवला.अभ्यास करून परीक्षा देत असताना खुप वेळा अपयश आले पण कुटुंब समर्थपणे मागे उभे असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही हेही तेवढेच खरे. सासु सासरे श्री. ज्ञानदेव सूर्यभान कदम व सौ. अलका ज्ञानदेव कदम रा. रवंदे, ता. कोपरगांव यांनी पूजाला आधार देत अपयशाने खचून न जाता प्रयत्न चालू ठेवण्याचा सल्ला दिला. अपयशांचा सामना करत पुजाने महाराष्ट्र ग्रामीण बँक मधे नोकरी मिळवत सर्वांना आनंदाचा धक्का दिला.नोकरी मिळाली की मुलांची धडपड सुरू होते ती आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याची. आपण आपल्या आई वडिलांना कश्या पद्धतीने आनंद देऊ शकतो याचा शोध मुलं घेत असतात. त्याचप्रमाणे, आपला पहिला पगार हा सर्वांसाठी नेहमीच भावनिक विषय असतो आणि तो कायम आपल्या स्मरणात राहावा असं प्रत्येकाला वाटतं.पूजा ने आपल्या पहिल्या पागराच औचित्य साधून आई वडील व सासू सासरे यांना त्यांच्या आयुष्यातील पाहिली विमान सफर करत तिरुपती बालाजी दर्शन घडविण्याच्या निर्णय घेतला. आई वडिलांसाठी ही गोष्ट अभिमानास्पद होतीच पण त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघताना आमच्या मनात फक्त एवढंच येत होत – “धरती पर अगर कहीं स्वर्ग है, तो यहीं है, यहीं है, यही हैं”


