Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedगायत्री कंपनी मुळे ऐन सणासुदीला शेतकरी अंधारात!!

गायत्री कंपनी मुळे ऐन सणासुदीला शेतकरी अंधारात!!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील
चांदेकसारे येथील गोरक्षनाथ रोड परिसरात गायत्री कंपनी चा खडी क्रेशर चा मोठा प्लांट आहे त्यामुळे गोरक्षनाथ रोड वर त्यांच्या अवजड वाहनांची दररोज वर्दळ असते. एेन दिवाळी सारख्या सणाला गायत्री कंपनी च्या वाहनांमुळे मेन लाईन ची विद्युत वितरण करणारी विद्युत तार तुटल्याने या भागातील सर्व परिसर ऐन दिवाळीत अंधारात गेला आहे.समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांना सागुन देखील ते या कडे जनुबुजून दुर्लक्ष करत आहे. हिंदू धर्मातील वर्षीतला हा सर्वात मोठा सण असून अतिशय महत्त्वाचा आहे.इतकी मोठी घटना घडून देखील गायत्री कंपनी चा कुठल्याही अधिकाऱ्याने समक्ष जाऊन परिस्थिती ची पाहणी करण्याची तस्ती देखील घेतली नाही गायत्री कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी बांधवांना दिवाळी अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे या गायत्री कंपनीच्या मनमानी कारभारावर स्थानिक शेतकरी अशोक होन, किशोर होन, सुशांत होन, दिपक होन, शांतीलाल होन,संकेत होन, शिवाजी होन, ज्ञानेश्वर होन, भगीरथ होन, सुनील होन, बाळू खरात, अशोक खरात, दिलीप खरात,शुभम खरात, सुधाकर खरात यांनी नाराजी व्यक्त केली.
लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!