
कोपरगाव प्रतिनिधी
अचानकपणे पतीचे निधन होणे हे कोणत्याही स्त्रीला न पचविता येणारे दु:ख आहे.त्याचबरोबर घराचा आधारवड गेल्यामुळे आपल्या कुटुंबाचे पुढे काय याची चिंता. मात्र अशा परिस्थितीत आ. आशुतोष काळेंनी आपले कर्तव्य बजावून तीन महिन्याचे वेतन दिले यावरून त्यांना समाजाची किती काळजी आहे हे दिसून येते. त्यांच्या सारखा पाठीराखा तुमच्यामागे उभा आहे त्यांचा तुम्हाला आधार आहे. त्यामुळे कधीच खचून जाऊ नका असा मौलिक सल्ला साईबाबा संस्थानच्या कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिला.
कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले त्या महिला रक्षाबंधनाच्या वेळी आ. आशुतोष काळे यांना राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी या महिलांना आपले तीन महिन्याचे वेतन देण्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्या कर्तव्यनिधीचे वाटप नुकतेच महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. आशुतोष काळे होते.
त्या पुढे म्हणाल्या की, तुमच्या आयुष्यात घडलेली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. माझ्या वडिलांचे देखील अचानक निधन झालेले आहे त्यामुळे घराचा आधारवड कोसळ्यावर काय यातना होतात त्या मीही अनुभवलेल्या आहेत. परंतु या वेदनेने खचून न जाता, त्या वेदनेला आपली कमजोरी न बनवता आपले सामर्थ्य बनवून जगाला दाखवून द्या की एकल महिला काय करू शकते. आपल्या संस्कृतीत स्त्री ला देवी स्वरूप मानले गेले आहे. प्रत्येक सण-उत्सवात तिला एक महत्त्वाचे स्थान आहे. तुम्ही एक दुर्गा, लक्ष्मी,सावित्री, अहिल्या, इंदिरा आहात.महिला ही आदिशक्ती असून महिला हे स्वतः एक कुटुंब असतं, मोठ्या स्त्री शक्तीच रूप असते.संपूर्ण सृष्टी ही स्त्री विना अपूर्णच आहे. ज्या रूढी परंपरा तुम्हाला जोखडून ठेवतात त्या सर्व तुम्ही तुमच्या कार्य-कर्तृत्वाने मोडून काढा.
तुम्ही आमदार आशुतोष काळे यांच्या मतदार संघातील आहात याचा अभिमान बाळगा. तुमच्या दुःखाच्या वेदनेवर फुंकर घालणारे आ. आशुतोष काळे व मी तुमच्या दु:खात सहभागी आहोत. भविष्यात तुम्हाला काही मदत करता आली तर आम्ही नक्की मदत करू अशी ग्वाही साईबाबा संस्थानच्या कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,पंचायत समिती सदस्य अनिल कदम, मधुकर टेके, रोहिदास होन, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, नगरसेविका सौ. प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा गंगूले, सौ. माधवी वाकचौरे, सौ. सपना मोरे, सौ. वर्षा शिंगाडे, सौ. उमा वहाडणे,सौ. सुहासिनी कोयटे,सौ. संगिता मालकर, सौ. सुधा ठोळे, अहमदनगर जिल्हा युवती काँगेसच्या सचिव सौ. स्वप्नजा वाबळे,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, डॉ. सौ.वैशाली आव्हाड, मीनाताई गुरले, रुपालीताई गुजराथी,गायत्रीताई हलवाई उपस्थित होते.कोरोनाने पती गमाविलेल्या सर्व माता-भगिनींना आ.आशुतोष काळे कर्तव्य निधीचे वाटप कार्यक्रमात बोलतांना साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत.


