Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedकर्मवीर नगरसह दुल्हनबाई वस्ती परिसरातील पावसाच्या पाण्यावर तोडगा काढा!

कर्मवीर नगरसह दुल्हनबाई वस्ती परिसरातील पावसाच्या पाण्यावर तोडगा काढा!

कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसची पालिकेकडे निवेदनातून मागणी

कोपरगाव/प्रतिनिधी

शहरातील कर्मवीरनगर व दुल्हनबाई वस्ती परिसरात पावसाचे पाणी घरात जाऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे पालिकेने कायमस्वरूपी नियोजन करावे, यासाठी सोमवारी (ता.२५) कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देण्यात आले.

आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी गोसावी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कर्मवीर नगर व दुल्हनबाई वस्ती परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरते. यावर पालिकेने कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे भावेश थोरात, संदीप कपिले, नवाज कुरेशी, धनंज कहार, आकाश डागा, तेजस साबळे, अक्षय आंग्रे, वाकचौरे सर, शिंदे सर, माकुणे सर, निरंजन कुंडेकर, लता वाकचौरे, सुनंदा माकुणे, सुनीता थोरात, अलका थोरात, लीना सोनवणे, लालमणी विश्वकर्मा, ममता निकम, सुवर्णा डांगे, अनिता क्षीरसागर, यमुना शिंदे, विजया सोनवणे, सौ. धापटकर आदिंनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!