Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedजर ४० वर्ष सत्ता तुमच्या घरात होती, तर तुम्ही प्रश्न दुसऱ्यांना कसे...

जर ४० वर्ष सत्ता तुमच्या घरात होती, तर तुम्ही प्रश्न दुसऱ्यांना कसे विचारता? – सुनील गंगुले

              कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्याची ४० वर्ष सत्ता आपल्या कुटुंबाने भोगली आहे. त्या ४० वर्षात आपल्या कुटुंबाने रोजगार वाढीसाठी कोणते दिवे लावले हे अगोदर सांगा. मागील वर्षी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांना आणून निळवंडेचे गाजर दाखविले आणि आता तीच पिपाणी पुन्हा वाजवून कोपरगाव शहरातील नागरिकांची पुन्हा एकदा दिशाभूल करीत आहात. परंतु नागरिक तुमच्या नौटंकीला आता बळी पडणार नाही. त्यामुळे पत्रकार परिषदेत खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नका. जर ४० वर्ष सत्ता तुमच्या घरात होती, तर तुम्ही प्रश्न दुसऱ्यांना कसे विचारता? असा तिखट सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.
                 आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून एन. एच. ७५२ जी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी जाहीर करून सावळीविहीर फाटा ते मालेगाव पर्यंतच्या रस्त्यासाठी १५० कोटी रुपये देण्याची घोषणा अहमदनगर येथे एका कार्यक्रमात केली आहे. मात्र नेहमीप्रमाणे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची कोल्हेंची धडपड यावेळी यशस्वी झाली नाही. असाच प्रयत्न १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत देखील श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न यापूर्वी फसला आहे त्यामुळे आलेल्या नैराश्यातून विवेक कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत केलेल्या आरोपांचा शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
                दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सुनील गंगुले यांनी पुढे असे म्हटले आहे की, निवडणुका आल्या की, आश्वासन द्यायची आणि दिलेली आश्वासन पूर्ण करायची नाही ही जुनी सवय आता बंद करा. कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी पाहिजे ते पाणी दारणेतून येऊद्या नाहीतर निळवंडेतून येऊद्या नागरिकांसाठी पाणी महत्वाचे आहे. त्यामुळे पाणी कुठूनही आले तरी चालेल मात्र पाण्याच्या नावाखाली जनतेच्या भावनांशी खेळू नका. पाच वर्षापूर्वी कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरातील नागरिकांना निळवंडेच्या पाण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना ते पाणी का मिळू शकले नाही? याचे उत्तर अगोदर दिले पाहिजे. आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडून तुमचे अपयश अजिबात झाकले जाणार नाही. कोपरगाव शहरातील २८ कामांना विरोध करण्यासाठी तुम्ही न्यायालयाची धरलेली वाट कोपरगावची जनता विसरणार नाही. कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा साठवण क्षमता नसल्यामुळे होत नाही त्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे          यांनी सत्ता नसतांना देखील संघर्ष केला व सत्ता मिळताच या पाच नंबर साठवण तलावाचे काम मार्गी लावले आहे. याउलट आपण सत्ता असतांना देखील पाच नंबर साठवण तलाव होऊ नये म्हणून काय प्रयत्न केले हे देखील शहरवासीय जाणून आहेत. तुमच्याकडे ४० वर्षापासून सत्ता होती तर शहराच्या पाण्याचा प्रश्न भिजत कोणी ठेवला याचे उत्तर एकदा आपल्या मनाला विचारा. मात्र निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल न करता आपली पाण्याची दुकानदारी आता बंद करा असा उपरोधिक सल्ला गंगुले यांनी कोल्हे यांना दिला आहे.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!