
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगांव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे ८६ वा धर्मांतर घोषणा दिनाचे औचित्य साधुन भीम अनुयायी यांनी संजयनगर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रीशरण,पंचशील व भिमस्तुती पठण करून अभिवादन केले. १३ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवले मुक्कामी धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यामुळे भीम अनुयायी यांचेमध्ये या धर्मांतर घोषणा दिनाला विशेष महत्व आहे.
प्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आर पी आय चे प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड यांनी प्रास्ताविक करतांना धर्मांतर घोषणा दिनाचे महत्व समजावून सांगितले व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्येच्या व शिक्षणाच्या जोरावर सर्वसामान्य माणसाला माणसाचे सर्व अधिकार मिळवून दिले व त्यामुळेच आज सर्वसामान्य माणूस देखील ताठ मानेने आपले जीवन जगत आहेत असे प्रतिपादन केले. आणि सर्वांना धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे यांनी डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सर्व अनुयायी यांनी सामुदायिक त्रिशरण, पंचशील व भिमस्तुतीचे पठण केले.
यावेळी किसन गायकवाड, संजय भालेराव, चांगदेव गायकवाड, भीमराव वरशिळ, बाळासाहेब पगारे, सोपान खरात, किशोर आबा गायकवाड,संजय आव्हाड,दिलीप काकडे,ग्राम पंचायत सदस्य प्रदिप गायकवाड, सुमित पगारे, बाळू साळवे, पिलू गायकवाड, आकाश पगारे, अवि पगारे, मंगलताई आव्हाड, विमल जगताप. विमलबाई वरशिळ आदींसह भीम अनुयायी उपस्थित होते. पिलू गायकवाड, बाळू साळवे, आकाश पगारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर सुमित पगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




