Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिकांचे पंचनामे करण्याची मागणी तहसीलदार साहेबांना दिले निवेदन - दिगंबर जावळे

पिकांचे पंचनामे करण्याची मागणी तहसीलदार साहेबांना दिले निवेदन – दिगंबर जावळे

कोपरगाव प्रतिनिधी

परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांनी मोठ्या अशाने आपले शेत फुलवली होती शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे खरेदी केली पण परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते झाले तोंडी आलेला घास हिसकला गेला. शेतात पाणी इतकेच साचले की सोयाबीन पीक पाण्याखाली गेले शेंगा सोडून गेल्या तसेच मका पिकांना कोम येऊ लागले शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, सोनेवाडी, जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द भागात शेतकऱ्यांच्या परतीच्या पावसाने पिकांची नासाडी झाली आहे सोनवडी गावातील समाजिक कार्यकर्ते दिगंबर जावळे, आप्पासाहेब जावळे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले पीक पाहणी करून कामगार तलाठी यांना पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली तसे दिगंबर जावळे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कसे नुकसान झाले याची माहिती सांगितली कृषी मंत्री भुसे साहेब यांनी लवकरात लवकर पंचनामे केले जाईल असे सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!