
कोपरगाव प्रतिनिधी.
२०२१ मध्ये मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी झालेला पाऊस व झालेल्या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या पाठ्पुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महसूल खात्याने ५०.४२ लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्यात मार्च, एप्रिल, मे महिन्यात काहीं गावांमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे तसेच काही ठिकाणी गारपीठ झाल्यामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी झालेल्या नुकसानीचे तातडीने अचूक पंचनामे करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील जवळपास १० गावातील ९९९ शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा व गारपिटीचा फटका बसून ३५८.९६ हेक्टर क्षेत्राला फटका बसला होता. त्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५०.४२ लाख रुपये रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहे.निसर्गनिर्मित संकटापुढे आपण सर्वजन हतबल असतो. मात्र अशा संकटाचा ज्या घटकांना फटका बसतो त्यावेळी त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते.कोपरगाव विधानसभा मतदार संघाला २०१९ पासून कधी अतिवृष्टी तर कधी महापुराचा सामना करावा लागला आहे. मात्र ज्या ज्यावेळी अशी संकटे आली त्या-त्यावेळी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरीकांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न केले आहे. त्या प्रयत्नातून आजवर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधीची मदत मिळवून दिली आहे. – आ. आशुतोष काळे


