कोपरगाव प्रतिनिधी.
तालुक्याच्या पूर्व भागातील कोपरगांव वैजापुर रत्यावरील तिळवणी येथील कोळनदीवरील पुल अत्यंत छोटा आहे. पावसाळयात या नदीस अनेकवेळा मोठया प्रमाणात पाणी येते परिणामी वाहतुक खोळंबुन राहते तर पादचारी, दुचाकी प्रवासी या पुलावरून अनेकवेळा वाहून गेले असून काही प्रमाणात वाहने देखील वाहुन गेली आहेत. मंगळवारी सकाळी आमचे पुतणे गोकूळ भाउसाहेब जाधव हे देखील ३०० फूट लांब खोलवर पाण्यात वाहून गेले पण याठिकाणी असलेल्या बिहारी मंडळींनी त्यांना वाचविले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला, तेव्हा या पुलाची उंची तातडीने वाढवावी अशी मागणी प्रगतशिल शेतकरी रावसाहेब जाधव यांनी केली आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे कार्यकाळात या पुलाची उंची वाढवावी म्हणून वारंवार मागणी करून पाठपुरावा केलेला आहे. कोपरगांव व संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांकडे याबाबत निवेदने दिलेली आहेत. कोपरगांव वैजापुर या रस्त्यावर वाहतुकीची अनेकवेळा वर्दळ असते. वैजापुर, औरंगाबाद, तसेच कोपरगांव, अहमदनगर, नाशिककडे, ये जा करणा-या वाहनांना या रस्त्याचा मोठा आधार आहे.सध्या पावसाळयाचे दिवस आहेत. कोळनदीस सध्या पाण्याचा प्रवाह मोठया प्रमाणांत आहे. तिळवणी नजीक पुलाची उंची अत्यंत छोटी आहे त्यामुळे अनेकवेळा वाहतूक बंद पडते. शाळकरी मुलांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना कसरत करावी लागते तर अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल तालुक्याच्या ठिकाणी नेताना अडचणी येतात. पुलावर पाणी असतांना काही प्रमाणांत वाहने यावरून प्रवास करतात ती अनेकवेळा पाण्यात पडून अपघात झालेले आहे. प्रत्येक पावसाळयात या पुलाची उंची छोटी असल्यान वाहतुक अडकुन पडते, त्याची उंची वाढवावी म्हणून मागणी करण्यात आली आहे मात्र हे काम अद्यापही प्रलंबित आहे. मंगळवारी सकाळी आमचे पुतणे गोकूळ भाउसाहेब जाधव हे वैजापुर येथे कामानिमीत्त जात असतांना ते या पुलावरून पाण्यांच्या प्रवाहात ३०० फुट वाहुन गेले, याठिकाणी असणा-या बिहारी व्यक्तींनी त्यांना वाचविले अन्यथा त्यांचा जीव धोक्यात गेला असता तेव्हा शासननि या पुलाची उंची तात्काळ वाढवावी, खासदार सदाशिव लोखंडे यांनी याकामी विशेष निधी उपलब्ध करून या भागातील नागरिकांनी ही अडचण सोडवावी असे रावसाहेब जाधव यांनी म्हटले आहे. पूलांची उंची वाढली नाही तर अनेक निरपराध व्यक्तींचे बळी यात जाणार आहेत. त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी या भागातील असंख्य रहिवासी व प्रवाशांनी मागणी केली आहे.


