Sunday, March 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedचार वर्षाचा पाठपुरावा तरी ब्राम्हणगाव शिवारात नळयांचे काम होईना शेतकरी प्रशासनापुढे झाले...

चार वर्षाचा पाठपुरावा तरी ब्राम्हणगाव शिवारात नळयांचे काम होईना शेतकरी प्रशासनापुढे झाले हतबल !!

कोपरगाव प्रतिनिधी

           तालुक्यातील ब्राम्हणगांव शिवारात गट नंबर ३६२ व त्याशेजारील अन्य आठ शेतक-यांचे गट नंबर येससांव ब्राम्हणगांव रस्त्याच्या कामामुळे बाधित झाले आहेत, रस्ता कामात ठेकेदाराने पुर्वीच्या नळया काढून टाकल्या परिणामी या सर्व शेतक-यांच्या शेतात पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साठले जाते त्यातुन कोटयावधी रूपये किंमतीच्या पिकांची नासाडी होते याबाबत गेल्या चार वर्षापासुन पाठपुरावा करतो पण सिमेंट नळया काही टाकल्या जात नाही अशी तकार सुभाष शामराव गाडे यांच्यासह अन्य शेतक-यांनी केली आहे, शेतकरी प्रशासनापुढे हतबल झाले आहेत.गुलाब चकीवादळाच्या प्रभावामुळे २७ सप्टेंबर रोजी मोठया प्रमाणांत अतिवृष्टी झाली आणि पावसाचे प्रचंड पाणी अजुनही शेतात साठलेले आहे त्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी मार्ग काढुन न दिल्याने हे पाणी आजही साठलेले आहे. काम अत्यंत शुल्लक आहे पण ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि त्यांची यंत्रणा यांना त्याबाबत काहीही घेणेदेणे उरलेले नाही, या परिसरातील शेतकरी मात्र मेटाकुटीला आले आहेत.यापुर्वी २२ सप्टेंबर २०२० व त्यानंतर चालु पावसाळयात मोठया प्रमाणांत पाउस झाला. शेतात हे पाणी तुंबून राहिले त्याबाबत तक्रारी केल्या पण प्रशासनाने शेतक-यांचे समाधान करण्यासाठी याठिकाणी सिमेंट नळया आणि सिमेंट आणून ठेवले. पावसाळयापुर्वी हे काम करावे म्हणून अनेकवेळा विनवण्या केल्या,. कार्यालयाचे उंबरठे झिजवले पण जाड कातडयाच्या या लोकांना शेतक-यांच्या त्रासाची दया आली नाही. दरवर्षी येथे शेतकरी कष्टाने पिके घेतात आणि पावसाच्या पाण्याने त्याची नासाडी होते. येसगांव ब्राम्हणगांव या रस्त्याचे काम २०१७ मध्ये आठशेरे ठेकेदाराने सुरू केले. गोदावरी डाव्या कालव्याजवळ पुर्वी अतिरिक्त पाणी वाहुन जाण्यांसाठी कलवर्ट बांधुन नळया टाकण्यात आल्या होत्या पण रस्त्याच्या कामात त्या काढुन घेण्यांत आल्या, काम सुरू असतांना संबंधीत शेतक-यांनी ही बाब ठेकेदाराच्या लक्षात आणून दिली पण त्याने पुर्ण रस्त्याचे काम नळया न टाकताच केले. परिणामी एका शुल्लक चुकीची शिक्षा हे ९ शेतकरी भोगत आहे. २७ व २८ सप्टेंबर २०२१ रोजी प्रचंड पाउस झाला, वरच्या बाजुने पाण्याचा लोंढा आला तो जाण्यासाठी मार्ग नसल्याने या ९ शेतक-यांच्या शेतात तो तुंबून राहिला. मुलाबाळांसह उपोषणाचा इशारा यापूर्वी दिला होता त्यावर येथे सिमेंट नळया आणून टाकल्या गेल्या पण वर्ष उलटुनही त्या बसविल्या गेल्या नाही, पक्क्या स्वरूपाचे काम करून या पाण्याचा निचरा व्हावा अशी या शेतक-यांची मागणी आहे पण या कामाला १४६० दिवस उलटुनही मुहूर्त  लागलेला नाही ही शोकांतिका आहे, अजून किती पावसाळ्यात आमचे पिके उध्वस्त होणार असे सुभाष गाडे शेवटी म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!