Sunday, March 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुनिता इंगळे यांचा ' राज्यस्तरीय जीवन गौरव' पुरस्काराने सन्मान

सुनिता इंगळे यांचा ‘ राज्यस्तरीय जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी

नगरपालिका शाळा क्र.६ च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम.इंगळे सुनिता यांना रयतेचा कैवारीच्या डिजिटल शैक्षणिक वृत्तपत्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘राज्यस्तरीय जीवन गौरव’ पुरस्काराने १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे सन्मानित करण्यात आले.
सुनिता इंगळे शाळास्तरावर व राज्यस्तरावर विविध उपक्रम घेऊन शैक्षणिक वर्तुळात वेगळी ओळख निर्माण केली आहे.तसेच विपूल प्रमाणात लेखनही केले आहे.. त्याचबरोबर त्यांनी शाळेत विविध उपक्रम राबविले. त्यांच्या कार्याची दखल घेत रयतेचा कैवारीच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथे सेवा निवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते आणि सेवानिवृत्त प्राचार्य बी. बी. जाधव यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून आमदार निलेश लंके, राजूदास जाधव, अमृत बांगर, गोपीनाथ जगताप, रामदास राहणे, परसराम निखाडे, संगीता नरवाडे, शाहू संभाजी भारती आदींची उपस्थिती होती.
सुनिता इंगळे या उत्तम लेखिका असून साहित्य क्षेत्रात ही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. विविध मासिकात व वर्तमानपत्रात त्याचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या शाळेत विविध उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत सहभागी करुन त्यांना बक्षीस मिळवून दिले आहे. त्यांना कविता करणे, गीत गायन करणे याचीही आवड आहे. नगरपालिका शाळा क्र.६ च्या उपाध्यापिका असणाऱ्या सुनिता इंगळे या कृतिशील,उपक्रमशील शिक्षिका आहेत.संपूर्ण राज्यभरात त्यांनी शालेय व सामाजिक कार्यातून एक वेगळा ठसा उमटवला आहे.राज्यस्तरीय बालरक्षक म्हणून बालरक्षक पेज महाराष्ट्र ने त्यांचा गौरव केला आहे.त्यांचा कोरोना काळातील ‘सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा’ उतारावाचन,भाषिकखेळ,ओळख पक्ष्यांची हा उपक्रम मुलांना नेहमीच ज्ञानाने समृद्ध करत राहिले.व या उपक्रमांचे संपूर्ण राज्यातही कौतुक झाले.या शिवाय झूम च्या माध्यमातून अध्यापन, शैक्षणिक ब्लाॕग निर्मिती,विविध शैक्षणिक अॕपचा वापर ,स्वनिर्मित व्हिडिओ,पीडीएफ आॕनलाईन साहित्य निर्मिती सातत्याने चालू आहे.टाकाऊतून टिकाऊ शैक्षणिक साहित्य निर्मितीतून त्यांनी एक वेगळाच ठसा संपूर्ण राज्यभर उमटवला आहे.
न.पा.शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारीसाहेब मोहनीशजी तुंबारे,सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,पालक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,विद्यार्थी या सर्वांनी त्यांच्या निवडीबद्दल कौतुक करुन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!