Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजस्थानमधील पाली नगर निकाय निवडणुकांसाठी आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे भाजपकडुन निवडणूक प्रभारीपदाची...

राजस्थानमधील पाली नगर निकाय निवडणुकांसाठी आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे भाजपकडुन निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी!!

कोपरगाव प्रतिनिधी

राजस्थानमधील आगामी नगर निकाय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने निवडणूक तयारीला वेग दिला असून, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली येथील निवडणूक प्रभारी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे आ.विवेकभैय्या कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या जबाबदारीनंतर आ. कोल्हे यांनी पाली येथे निवडणूक तयारीसह पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या कामाला सुरुवात केली असून, आगामी निवडणुकीत भाजपचा विजय सुनिश्चित करण्यासाठी बूथ स्तरापर्यंत नियोजन करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आ.विवेक कोल्हे यांना मिळालेली ही जबाबदारी महत्त्वाची मानली जाते आहे.
आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी निवडणूक निरीक्षक नरेंद्र पवार यांच्यासमवेत पाली येथील भाजप जिल्हा कार्यालयास भेट दिली. यावेळी भाजप पाली परिवाराच्या वतीने पारंपरिक साफा बांधून आ. कोल्हे यांचे उत्स्फूर्त व आत्मीय स्वागत करण्यात आले.महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी तसेच पाली भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक पार पडली. आगामी नगर निकाय निवडणुकीत पालीमध्ये भाजपचा विजय निश्चित करण्यासह राजस्थानातील ‘ट्रिपल इंजिन’ सरकार अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत बूथ सशक्तीकरण, संघटनात्मक नियोजन, कार्यकर्त्यांची बांधणी आणि प्रभावी जनसंपर्क यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक बूथ अधिक सक्षम करून पक्षाची संघटनात्मक ताकद तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून भाजपची ताकद वाढविण्याचे आवाहन आ.विवेकभैय्या कोल्हे यांनी केले
आ. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, आगामी नगर निकाय निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी संघटनेची ताकद अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ सशक्तीकरण, प्रभावी जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीचे काम सुरू आहे. पालीतील कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह आणि ऊर्जा भाजपच्या विजयासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. नगर निकाय निवडणुकीमध्ये भाजपाचा निश्चितच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पाली जिल्हा महामंत्री नारायण कुमावत, भाजप प्रवक्ते मंगलराम प्रजापत, प्रताप मंडल अध्यक्ष मानवेन्द्रसिंह भाटी, शिवाजी मंडल उपाध्यक्ष अभिषेक दुग्गड, प्रताप मंडल महामंत्री कैलाश गौड, प्रताप मंडल मंत्री अजय वैष्णव तसेच जिलामंत्री प्रताप सिंह यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!