
कोपरगाव प्रतिनिधी
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या ‘एक राखी जवानांसाठी’ अभियानाच्या सहाव्या वर्षातील रक्षा रथाचे साईनगरी शिर्डी येथून गुजरात-कच्छ (भारत-पाकिस्तान) सीमेच्या दिशेने प्रस्थान झाले. श्री साईबाबांच्या पावन भूमीतून रवाना झालेला हा रक्षा रथ माता-भगिनींनी जवानांसाठी प्रेमाने पाठविलेल्या राख्या, विद्यार्थ्यांची देशभक्ती आणि जवानांप्रती कृतज्ञतेची भावना घेऊन सीमेच्या दिशेने निघाला.
या उपक्रमाला शिर्डीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माता-भगिनी, विद्यार्थी, साईभक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जवानांसाठी राख्या जमा केल्या. त्यामुळे शिर्डीतील या प्रस्थान सोहळ्यात भक्ती आणि शक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.यावेळी काशीका नंदगिरी महाराजांच्या आश्रमातील विद्यार्थी व शिक्षकांनी पावली आणि भजन सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले. आत्मा मालिक शैक्षणिक संस्थानच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जवानांसाठी राख्या पाठवल्या. साईभक्त माता-भगिनींनीही राख्या जमा करून या अभियानाला उत्स्फूर्त साथ दिली.यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे म्हणाले, “देशाच्या सीमेवर कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना आपण विसरलेलो नाही, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे, हा विश्वास देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी राखी पाठविणे म्हणजे त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला कृतज्ञतेने वंदन करण्याची भावना आहे. शिर्डीच्या पावन भूमीतून निघालेला हा रक्षा रथ माता-भगिनींचे प्रेम, विद्यार्थ्यांची देशभक्ती आणि प्रत्येक भारतीयाच्या मनातील जवानांप्रती असलेली कृतज्ञता घेऊन सीमेपर्यंत पोहोचणार आहे. गेल्या पाच वर्षांत या अभियानाला मिळालेला प्रतिसाद सातत्याने वाढत असून, यंदाच्या सहाव्या वर्षीही नागरिकांनी दाखविलेला उत्स्फूर्त सहभाग निश्चितच प्रेरणादायी आहे.”या प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव मते, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपा माजी शहराध्यक्ष सचिन शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष चेतन कोते, युवा मोर्चाचे माजी जिल्हा सरचिटणीस नरेश सुराणा, गणेश जाधव, राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चौगुले, राहाता नगर परिषदेचे नगरसेवक धनंजय गाडेकर, शिवसेनेचे अमोल गायके, रवींद्र सोनवणे, गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेबदादा डांगे पाटील, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (IAS), नारायणराव कार्ले, भगवानराव टिळेकर, संपत हिंगे, अनिल गाढवे, बाळासाहेब चोळके, नानासाहेब नळे, संजय सरोदे, अनिल बोठे, भाऊसाहेब थेटे, भगवान वाघ, केदार कार्ले, प्रसाद आहेर, नारायण काकड, राजेंद्र लहारे, दिलीप शिरसागर, राजेंद्र आग्रे, एल. एम. डांगे, विजय गाडेकर, गोकुळ ठूबे, सदाशिव गाडेकर, रमेश गागारे, साहिल म्हस्के, विक्रम वाघ, राजेंद्र बाबुळके, आलेश कापसे, अनिल गोरे यांच्यासह साई संस्थानचे कर्मचारी, विविध लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, युवासेवक, भाविक-भक्त, माता-भगिनी आणि शिर्डीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.एक राखी जवानो के नाम या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेले सहा वर्षांपासून करण्यात येते आहे.या वर्षी शिर्डी ते कच्छ बॉर्डर असा प्रवास हा राखी रथ करणार आहे.गतवर्षी शिर्डी ते श्रीनगर यात्रेदरम्यान सव्वा लाख राखी संकलित झाल्या होत्या.त्याच प्रमाणे उदंड प्रतिसाद यावेळी देखील मिळेल अशी अपेक्षा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आ.विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.साईबाबांच्या पावन भूमीतून अध्यात्मिक ऊर्जा घेत अहोरात्र देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या प्रति आपला आदरभाव व्यक्त व्हावा या दृष्टीने अशा राष्ट्रभक्तीच्या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे.स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची आश्रय भूमी म्हणून साईबाबांच्या भूमिकडे पाहिले जाते.१५ लाखाहून अधिक जवान २४ तास डोळ्यात तेल घालून देशाची सीमा जपता आहेत असे कोल्हे म्हणाले व या राखी यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे व त्याची सुरुवात शिर्डी येथून होते आहे हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.श्री साईबाबा संस्थान नेहमी राष्ट्रप्रेमाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. आ.विवेक कोल्हे आणि त्यांच्या सर्व युवासेवकांनी देशाच्या सैनिकांप्रति व त्यांच्या त्यागप्रती जपलेली संवेदनशील भावना मोलाची आहे अशी भावना साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या.


