
कोपरगाव प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील “अमृत उद्योजकता विकास” कार्यक्रमाचे उदघाटन मा. मकरंद कोऱ्हाळकर सर अध्यक्ष,ब्राह्मण सभा यांच्या हस्ते व अमृत संस्थे चे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
प्रशिक्षणाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली.मा श्रीकांत जोशी सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी अमृत मित्र संदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत पेठ थेट बाजारपेठ,ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, व्याज परतावा योजना तसेच सी.एम.ई.जि.पी योजना सह इतर योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अमृत संस्थे मुळे हे प्रशिक्षण मिळत असल्याने लाभार्थी यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रशिक्षणात एकूण १४ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. हे प्रशिक्षण एकूण १० दिवसीय असणार आहे.
मा मकरंद कोऱ्हाळकर यांनी बोलताना सांगितले कि कोपरगाव परिसरातील समाज बांधव यांनी अमृत संस्थेच्या योजनाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या अमृत संस्थेविषयी अहिल्यानगर चे जिल्हा व्यवस्थापक श्री. सागर भोपे यांनी अधिक माहीत स्पष्ट केली ते म्हणाले की महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये आहे.


