Friday, July 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगावला गुन्हेगारीच्या विळख्यात ढकलणाऱ्यांनी इतरांवर बोट दाखवू नये !!-विनोद राक्षे

कोपरगावला गुन्हेगारीच्या विळख्यात ढकलणाऱ्यांनी इतरांवर बोट दाखवू नये !!-विनोद राक्षे

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरात गुन्हेगारी, अवैध धंदे,चक्री-बिंगोसारख्या, गांजा,गावठी कट्टा अशा बेकायदेशीर प्रकारांमुळे नागरिकांमध्ये रोष काळे यांच्याबद्दल पालिका निवडणुकीत दिसला आहे त्यांचे ते दुःख दूर होत नसल्याने नगरपरिषदेवर संबंध नसलेल्या गोष्टीवर टीका करत आहे.त्यांच्या स्विय्य सहायक्काने केलेली गुन्हेगारी सर्वांनी डोळ्यांनी पाहिली आहे त्यामुळे खरे गुन्हेगार सांभाळणारे आ.काळे हे अशा घटनांना जबाबदार असल्याने त्यांच्या बगलबच्च्यांनी इतरांवर आरोप करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा जोरदार टोला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद राक्षे यांनी लगावला आहे.
लहिरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना राक्षे म्हणाले की, कोपरगावमध्ये गेल्या काही वर्षांत काळे यांच्या कार्यकाळात अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर कारवायांना अभूतपूर्व चालना मिळाली. अनेक ठिकाणी चक्री-बिंगोसारखे प्रकार उघडकीस आले असून, अशा कारवायांमध्ये आ. आशुतोष काळे यांच्या कार्यकर्त्यांची नावे सातत्याने चर्चेत राहिली आहेत. त्यामुळे कोपरगावची ओळख विकासाऐवजी गुन्हेगारीच्या घटनांमुळे होऊ लागली, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
राक्षे यांनी पुढे सांगितले की, जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी काळे गटाकडून विरोधकांवर निराधार आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. स्वतःच्या कारभारात वाढलेला भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट आणि पी ए चे कारणामे याबाबत उत्तर देण्याऐवजी इतरांवर टीका करणे हा केवळ राजकीय दिखावा आहे.
कोपरगावच्या जनतेला सुरक्षित, कायद्याचे राज्य असलेले आणि विकासाभिमुख वातावरण अपेक्षित आहे. मात्र, गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्यांनी नैतिकतेचे धडे देणे शोभणारे नाही. जनतेने सर्व घडामोडी जवळून पाहिल्या असून, योग्य वेळी त्याचे उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून दिले जाईल, असा विश्वासही राक्षे यांनी व्यक्त केला.
इतरांवर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय आणि प्रशासकीय कारभाराचा प्रामाणिक आढावा घ्यावा. कोपरगावची प्रतिमा मलिन करणाऱ्या प्रवृत्तींना प्रोत्साहन देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून जनतेची माफी मागणे अधिक योग्य ठरेल, असेही विनोद राक्षे यांनी शेवटी म्हटले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!