
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात सुरू असलेला विवाद आता आक्रमक वळणावर गेला आहे. माझे जात प्रमाणपत्र हे हिंदू महार आहे मात्र माझ्या वडिलांचे प्रमाणपत्र हे त्यांच्या शाळेतील तत्कालीन व्यवस्थेमुळे ख्रिश्चन असे झालेले होते त्याचा आधार घेत माझ्यावर जाणीवपूर्वक षडयंत्र करण्याचे काम आशुतोष काळे यांनी केले आहे. या प्रकरणात मला उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे.त्या दृष्टीने मी कार्यवाही करणार आहे मात्र बनावट खाती वापरून माझी जुन्या व्हिडिओची तोडमोड करून जी बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत त्यांना समोरासमोर येण्याचे खुले आव्हान देतो असे जितेंद्र रणशूर यांनी केले. ही लढाई न्यायालयासोबतच रस्त्यावर देखील आता लढली जाईल असा देखील इशारा यावेळी सर्वांकडून देण्यात आला.
पुढे बोलताना ते म्हणाले मी इथलाच नागरिक आहे आणि माझे बहुसंख्य नातेवाईक आज पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. माझ्या बरोबरची लढाई ही विरोधक निवडणुकीत हरले त्यानंतर त्यांनी वैफल्यातून केलेले हे उद्योग आहे.जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी आजोबांचा किंवा पन्नास वर्षापेक्षा जुना पुरावा अपेक्षित असतो तो हिंदू महार असा आहे त्यामुळे राजकीय दबावापोटी तर आमच्यावर अन्याय केला जात नाही ना असा सवाल केला.
एकीकडे कोल्हे कुटुंब हे कारखाना इतिहासात राज्यात सर्वात प्रथम मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व देत व्हा चेअरमन केले अनेकाना नगराध्यक्ष, उपनगराध्य,सरपंच आणि पदे देण्याचे काम केले.मात्र काळे यांची मागासवर्गीय समाजावर अन्याय करण्याची परंपरा आहे.यासह अल्पसंख्याख समाजाचे पवित्र कुराण विटंबना झाली तेव्हा आशुतोष काळे हे त्यात गप्प राहिले मात्र स्वतःच्या पी ए ने गुंडागर्दी केली त्याला वाचवण्यासाठी दोन दोन वाजता पोलिस स्टेशनला गेले हे सर्वांनी पाहिले आहे असे रमेश घोडेराव म्हणाले.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे, बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे,आ.विवेकभैय्या कोल्हे हे आमच्या समाजासाठी उभे राहतात मात्र काळे कुटुंब हे आमच्या समाजातील नेतृत्व संपवण्याचे पाप करतात. आजवर अनेक नेतृत्व संपवण्याचे पाप आशुतोष काळे आणि काळे कुटुंबाने केले आहे यापुढे मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व आम्ही संपू देणार नाही त्यासाठी न्यायालयासोबत वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई लढू मात्र जितेंद्र रणशूर यांच्यासारखे नेतृत्व आम्ही संपू देणार नाही असे संतोष शेजवळ यांनी दिला आहे.
प्रतीक पगारे यांनी विरोधकांच्या खालच्या पातळीवरील प्रचाराचे वाभाडे काढताना जर यापुढे आम्हाला फेक आयडी चालवणारा कोणी सापडला तर त्याला योग्य त्या पद्धतीने उत्तर दिले जाईल. एक जितेंद्र रणशूर तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केला तर विवेकभैय्या कोल्हे हे दहा नेते तयार करतील याची जाणीव ठेवा व आमच्याशी लढाई करायची असेल तर अशी छुप्या पद्धतीने न करता समोरासमोर करण्याची तयारी ठेवा असा इशारा दिला.
जेष्ठ नेते अशोक शिंदे म्हणाले की जितेंद्र हे आमचे जावई आहेत. त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची सर्वांना माहिती आहे. सर्वांसाठी धावून जाण्याचे काम ते करतात त्यामुळे मोठे होणारे हे नेतृत्व विरोधकांना डोळ्यात खूपू लागल्याने जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे.
प्रदीप अहिरे म्हणाले की आमच्या समाजाचे नेतृत्व आम्ही संपू देणार नाही जर कोणी मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा काळे गटाला जशास तसे उत्तर आगामी काळात दिले जाईल.जितेंद्र रणशूर यांनी २५ वर्षापासून सर्व समाजासाठी नेहमी प्रामाणिक भावना ठेवत काम केले आहे.जर असा खोटा व प्रचार करणारे सोशल मीडियावरील अकाउंट सापडले तर त्यांना कायदेशीर कारवाई बरोबरच रस्त्यावरचा भिमटोला देण्याची देखील तयारी समाज बांधवांनी बोलून दाखवली आहे. या पत्रकार परिषदेसाठी मोठ्या संख्येने कोपरगाव मतदारसंघातून मागासवर्गीय समाज बांधव रनशूर यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेले होते.
आंबेडकरी चळवळीचे नेते जितेंद्र रणशूर यांना संपवण्याचा प्रयत्न काळे यांच्याकडून सुरू आहे.असे आमच्या मागासवर्गीय समजातील अनेक नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न काळे यांनी केला आहे मात्र कोल्हे कुटुंबाने कायम न्याय दिला.आंबेडकर चळवळीचे नेतृत्व कधीही संपवू देणार नाही वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई समाज लढेल.


