Tuesday, June 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाढीव घरपट्टीविरोधात कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस ठाम;जुन्याच पद्धतीने कर आकारणी मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वाढीव घरपट्टीविरोधात कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस ठाम;जुन्याच पद्धतीने कर आकारणी मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना वाढीव दराने घरपट्टी (मालमत्ता कर) आकारण्यात आली आहे. वाढीव कराच्या अधिकृत घरपट्टी पावत्या देखील नागरीकांना देण्यात आल्या आहेत. मात्र या वाढीव घरपट्टी आकारणी बाबत नागरीकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याने हजारो नागरिकांनी वाढीव घरपट्टी विरोधात हरकती नोंदविल्या आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य, मजूर, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंब आणि अल्प गटातील नागरिकांचे कंबरडे मोडले असून त्यात हि अवाजवी घरपट्टी (मालमत्ता कर) लादने अत्यंत अन्यायकारक असल्याने कोपरगाव शहरात जुन्या पद्धतीनेच घरपट्टी आकारण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, मालमत्तांचे चुकीचे वर्गीकरण, कर निर्धारणातील त्रुटी, आकारणीतील विसंगती तसेच नागरिकांना पुरेशी माहिती न देता करण्यात आलेली आहे. याच बरोबर केलेली वाढ हि थोडी थोडकी नसून दुप्पट, तिप्पट तर काही ठिकाणी चौपट देखील करण्यात आली असल्याने याबाबत अनेक हरकती व तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. जून महिना संपला असताना देखील पाऊस झालेला नसल्याने बाजारपेठ ही ठप्प आहे. त्याच बरोबर वाढलेली महागाई, आवाक्याबाहेर चाललेला जीवनावश्यक खर्च अशा आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या कोपरगावच्या नागरिकांवर वाढीव घरपट्टी लादल्यास त्यांच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढणार असल्याने आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात २ दिवसांचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि मालमत्ता धारकांनी पाठींबा दर्शिवलेला आहे.
कोपरगाव नगरपरिषद सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी अवाजवी वाढीव घरपट्टी विषयावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र नगरपालिका सत्ताधारी या विषयावर आजतागायत चर्चा करण्याची तयारी दर्शिवत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदन सदर करून कोपरगाव शहरात जुन्या पद्धतीनेच घरपट्टी आकारण्यात यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी सुनिल गंगुले, गटनेत्या नगरसेविका सौ. गौरीताई पहाडे, हाजी मेहमूदभाई सय्यद, स्मिता साबळे, संदीप कपिले, सौ. निर्मलाताई आढाव, सौ. सोनमताई त्रिभुवन, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक मंदार पहाडे, रमेश गवळी, अरुण त्रिभुवन आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!