
कोपरगाव प्रतिनिधी
आ. आशुतोष काळे हे सर्व सामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असून सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यामुळे मागील सहा वर्षापासून त्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून नागरीकांच्या सर्वच शासकीय कार्यालयातील समस्या एकाच ठिकाणी एकाच वेळी दूर केल्या आहेत. तसेच यापूर्वी छोट्या-छोट्या दाखल्यांसाठी नागरिकांना अनेक दिवस तहसील कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यामुळे नागरीकांना कागदपत्राची जुळवाजुळव करतांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. परंतु महायुती शासनाने सुरु केलेल्या महाराजस्व अभियानाचा जास्तीत जास्त फायदा मतदार संघातील नागरीकांना करून देण्यासाठी कोपरगाव मतदार संघात महाराजस्व अभियानाला गती दिल्यामुळे सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांचा मोठा त्रास वाचला असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे यांनी म्हटले आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पोहेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार सौ.प्रफुल्लीता सातपुते होत्या.
कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांचे प्रशासकीय विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी काढण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कोकमठाण, पुणतांबा, सुरेगाव, रवंदे, दहेगाव बोलका मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर यापूर्वी राबविण्यात आले असून या मंडळातील नागरिकांना आवश्यक दाखले एकाच छताखाली मिळाल्यामुळे त्यांचे समाधान झाले आहे. सोमवार (दि.११)रोजी पोहेगाव मंडळातील नागरिकांचे, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी वक्रतुंड मंगल कार्यालय, पोहेगाव येथे महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार सौ.प्रफुल्लिता सातपुते, कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रविण शिंदे यांच्या हस्ते पार पडले.
या शिबिराच्या माध्यातून पोहेगाव मंडळातील सर्व सामान्य नागरिक, महिला,विद्यार्थी ज्येष्ठ नागरीकांना आवश्यक असलेले शासकीय दाखले वितरीत करण्यात आली. दहावी बारावीचे निकाल नुकतेच प्रसिद्ध झाले असून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पुढच्या प्रवेशासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी करावी लागणारी धावपळ आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकाराने पोहेगावात महाराजस्व शिबीराचे आयोजन करण्यात आल्यामुळे करावी लागली नाही. विद्यार्थ्यांना उत्पन्न, रहिवासी आणि जातीच्या दाखल्यांचे वितरण, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांचे वितरण यावेळी करण्यात आले. या शिबिराचा सगळ्यात जास्त फायदा या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना झाला. याच बरोबर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी आणि हे प्रमाणपत्र ऑनलाईन करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या मात्र या शिबिराच्या माध्यमातून वृद्धांना सुविधा उपलब्ध झाली असल्याने वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरित इतर सर्व सामान्य नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्यांचे निवारण करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार सौ. प्रफुल्लिता सातपुते, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, आरोग्य विभागाचे डॉ. वाडेकर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल रोहमारे, शंकरराव चव्हाण, वसंतराव आभाळे, गंगाधर औताडे, पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, गौतम बँकेचे संचालक बाबुराव थोरात, बाळासाहेब भालेराव, रांजणगाब देशमुखचे सरपंच गजानन मते, बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे, मधुकर औताडे, संदिप रोहमारे, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, विनोद रोहमारे, राजेंद्र पाचोरे, वाल्मिक नवले, राधाकिसन कोल्हे, कचेश्वर सावंत, रामराव शिलेदार, कौसरभाई सय्यद, विशाल रोहमारे, राजेंद्र रोहमारे, शेखोजी रणधीर, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


