Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वच्छ पाणी पिल्यास जीवन निरोगी राहते!!- चंद्रानंद महाराज

स्वच्छ पाणी पिल्यास जीवन निरोगी राहते!!- चंद्रानंद महाराज

जेऊर कुंभारी (प्रतिनिधी)

“मनुष्याच्या जीवनासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. जल हेच जीवन असून स्वच्छ पाणी पिल्यास आरोग्य निरोगी राहते,” असे प्रतिपादन विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे ज्येष्ठ संत चंद्रानंद महाराज यांनी केले.
ते जेऊर कुंभारी येथे उभारण्यात आलेल्या साई माऊली
नवीन अॅक्वा फिल्टर प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, स्वच्छ पाणी हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असून या प्लांटमुळे गावातील नागरिकांना शुद्ध व दर्जेदार पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यास मोठी मदत होणार आहे.
सदर अॅक्वा प्लांट अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी शुद्ध करून गावात पुरवठा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास चंद्रानंद महाराज,
चांगदेव महाराज, माजी सभापती शिवाजीराव वक्ते आनंदराव भाबड, उपसरपंच जालिंदर चव्हाण, बाजीराव वक्ते,रमेश वक्ते , महेंद्र वक्ते, किरण पाटीलबा वक्ते,रामभाऊ वक्ते,पांडूरंग वक्ते, सुरेश पगारे, बाबासाहेब वायकर,नाना मोहिते,संतोष जाधव ,सचिन पवार,
बाबासाहेब पवार,रवी वक्ते,योगेश वक्ते,ज्ञानेश्वर वक्ते, किरण वक्ते, राणा वक्ते, बापू इंगळे,आकाश जगताप,सचिन सुरेवांशी,भाऊसाहेब जाधव,दत्तात्रय जाधव,आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन बलवीर गरूड यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!