Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री स्वामी समर्थ केंद्राला निधी मिळवून देण्यात आमदार आशुतोष काळेंचे योगदान!!

श्री स्वामी समर्थ केंद्राला निधी मिळवून देण्यात आमदार आशुतोष काळेंचे योगदान!!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील सुबद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभागृहासाठी निधी मिळवून देण्यात आमदार आशुतोष काळे यांचे मोठे योगदान आहे. मात्र ज्यांचा या निधीशी काडीचाही संबंध नाही त्यांनी श्रेय घेण्यासाठी रविवार (दि.१९) रोजी अक्षयतृतीयेच्या दिवशी दमबाजीचा केलेला प्रकार श्री स्वामी भक्तांना व कोपरगावकरांना चिड आणणारा असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोमनाथ आढाव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात सोमनाथ आढाव यांनी पुढे असे म्हटले आहे की, आमदार आशुतोष काळे यांनी शहराच्या विकासासाठी आणि विशेषतः श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सोयीसुविधांसाठी जवळपास ४७ लाखांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. कोल्हे गट केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. आयत्या पिठावर रेघा ओढणे ही कोल्हे गटाची जुनीच नीती असून त्याची पुनरावृत्ती रविवार रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली आहे .कोपरगाव शहरातील हजारो स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थ केंद्राच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासन काळात ४० लाख रुपयांचा भरीव निधी या केंद्रासाठी मंजूर करून आणला. एवढेच नव्हे तर आपल्या स्थानिक आमदार निधीतूनही १० लाख रुपये निधी श्री स्वामी समर्थ केंद्राला दिला आहे भविष्यात श्री स्वामी समर्थ केंद्राच्या विकास कामासाठी आ. आशुतोष काळे निधीची कमतरता भासू देणार नाहीत. मात्र कोल्हे गटाकडे दाखवण्यासारखे कोणतेही काम नसल्यामुळे ते आमदार आशुतोष काळेंनी मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने करून आणि फ्लेक्सबाजी करून आणि खोट्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत.
कोल्हे गटाला जर भूमिपूजन आणि उद्घाटन करायची एवढीच हौस असेल तर त्यांनी श्री स्वामी भक्तांना आणि कोपरगावकरांना याचे उत्तर द्यावे की, त्यांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ केंद्रांसाठी किती निधी दिला आणि कोणती विकासकामे केली याचा हिशोब स्वामी भक्तांना द्यावा असे आव्हान केले असून विकास कामांना निधी देणारे कधीही विकास कामांना विरोध करत नाही. मात्र ज्यांचा निधीशी काहीही संबंध नाही ते कांगावा करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!