
कोपरगाव प्रतिनिधी
खोटे बोलून आरोप करणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या भोंदूशी छुपी समता साधणाऱ्या वसुली एजंटला आता नागरिकांनी ओळखले असल्याची जबरी टीका कलविंदर दडीयाल यांनी केली आहे.धार्मिक आणि पवित्र ठिकाणीही राजकीय गोंधळ निर्माण करण्यासाठी स्वतःचे लोक पुढे करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातो, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.उलट खोट्या अफवाखोरांचा दुटप्पी चेहरा आणि खोटेपणा काय आहे त्यांचे हात कशात काळे झालेले आहेत हे लवकरच अनेक पुराव्यानिशी उघड पाडणार असल्याचे दडीयाल यांनी जाहीर केले आहे.
विरोधकांच्या खोट्या भूमिकांना विरोध करणे याचा अर्थ कुणालाही दमबाजी झाली नसून आमच्या नेत्यांनी आम्हाला रोकण्याचे काम केले.विरोधकांचे उलटा चोर कोतवाल को दाटे अशी भूमिका विरोधकांची आहे असे खडेबोल देखील सुनावले आहे तसेच विरोधकांनी पातळी सोडून राजकारण करू नये अन्यथा त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आल्यास तोंड दाखवण्यास जागा उरणार नाही याचे भान ठेवावे असा इशारा देखील दिला आहे.
दडीयाल म्हणाले की, विरोधकांनी धार्मिक ठिकाणी प्रथम गोंधळ घालायचा आणि नंतर त्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा, हा काही जणांचा ठरलेला डाव आहे. अशा प्रकारे अर्धसत्य आणि चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये काळे संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता सुज्ञ नागरिक अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काळे गटाने स्वामी समर्थांच्या सभामंडपाला विरोध दर्शविल्याची बाब त्यांनी निषेधार्ह असल्याचे स्पष्ट केले. धार्मिक स्थळांच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यावरून राजकारण करणे, हे कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.जनतेने सत्य परिस्थिती समजून घेत अशा भोंदू एजंटना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.


