Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विकासाचा पाया!!- मा.आ.स्नेहलताताई कोल्हे

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विकासाचा पाया!!- मा.आ.स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक आहेत. स्वराज्य, न्याय, स्त्री-सन्मान आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब केला, तरच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करू शकतो. प्रत्येकाने आपल्या कार्यातून प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजहिताची जाणीव जपली, तर महाराजांचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल. त्यांच्या समावेशक विचारांच्या दिशेने प्रत्येकाने पाऊल टाकले पाहिजे, असे प्रतिपादन कोपरगावच्या मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान येथे जयंतीउत्सव सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगावच्या मा. आ.स्नेहलताताई कोल्हे होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन युवानेते विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे तसेच संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत.त्यांच्या विचारांमध्ये सामान्य माणसाच्या हिताचा विचार होता.आजच्या तरुणांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. स्वराज्य, शिस्त आणि धैर्य ही मूल्ये आपण आयुष्यात अंगीकारली पाहिजेत. समाजासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येकामध्ये असावी. स्त्री-सन्मान आणि न्याय या तत्त्वांचे पालन करणे हीच खरी मानवंदना आहे. आपण एकत्र राहून समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला आत्मविश्वास देत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.याप्रसंगी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे ट्रस्टी सुमित कोल्हे, संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे,कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, विविध क्षेत्रातील मान्यवर,अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी,पालक तसेच कोपरगाव शहरातील समस्त शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकाळी अभिषेक, आरती व मानवंदना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सर्व परिसर दुमदुमून गेला.संत ज्ञानेश्वर इंग्लीश मिडीयम स्कूल, संजीवनी इंग्लीश मिडीयम स्कूल, पदमा मेहता प्राथमिक विद्यालय, भागचंद माणिकचंद ठोळे प्राथमिक विद्यालय, के.बी.पी. माध्यमिक विद्यालय, लायन्स मुक-बधिर विद्यालय, डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्यामंदिर, एम. के. आढाव माध्यमिक विद्यालय, विद्याप्रबोधिनी प्राथ. व माध्य. विद्यालय, आत्मा मालिक ओम गुरूदेव गुरूकुल, कोकमठाण आत्मा मालिक ओम गुरूदेव इंग्लीश मिडीयम स्कूल, के.जे. सोमय्या कॉलेज, शांभवी ग्रुप या शाळा व महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने लायन्स मुक-बधिर विद्यालयास ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. संजीवनी स्कूल, आत्मा मालिक प्यारा मिलिटरी स्कूल, डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर, एस. जी. विद्यालय, के. बी. पी. विद्यालय तसेच एनडीए अकॅडमी आणि ५७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. संजीवनी सैनिकी स्कूलला २६ जानेवारी रोजी भारतातील ब्रास बँड स्पर्धेत राजपथावर सादरीकरण करण्याचा मान मिळाला तसेच प्रथम बक्षीस मिळाल्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
देशात नावलौकिक मिळवलेल्या व प्रथम क्रमांक संपादन केलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलच्या बँड पथकाने अतिशय मंत्रमुग्ध करत शिवप्रेमी नागरिकांची मने जिंकली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!