
जेऊर कुंभारी वार्ताहर
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
१९ फेब्रुवारी म्हणजे रयतेचा राजा शिवाजी महाराज यांची जयंती. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी मावळे एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराज हे मराठी अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुघलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला त्यांनी गनिमी कावा युक्ती वापरून अनेक गड किल्ले जिंकले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सुनिल होन होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन अश्विनी होन होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून करण्यात आली इयत्ता आठवी मधील विद्यार्थी समर्थ दहे याने शिवाजी महाराजांचे पात्र साकारले तर सिद्धी जाधव या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांचे पात्र साकारले. एलकेजी मधील चिमुकली अन्वी लिंभुरे या विद्यार्थिनीने शिवगर्जना देऊन सर्व वातावरण शिवमय केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सर्वांपर्यंत पोहोचवली तसेच विद्यार्थ्यांनी चारोळ्या देखील सादर केल्या.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि अस्थेचे केंद्र आहे त्यांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे असे प्राचार्या ज्योती खरात यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
आजचा पिढीला शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा सांगून प्रोत्साहित करण्याची गरज आहे असे मनोगत रेश्मा होन यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल होन यांनी केले, तर सायली बोरावके यांनी आभार व्यक्त केले,तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव सुनिल होन, संचालक सागर होन, प्राचार्या ज्योती खरात, अश्विनी होन , पल्लवी होन ,स्वाती वक्ते, स्नेहल होन, मिनल बोरावके, शितल होन,सायली बोरावके, कविता लिंभुरे,रूपाली होन,रेश्मा जावळे ,प्रीती दहे इ. शिक्षक तसेच मुक्ता तुवर, रेणुका साळुंके, शिवाजी जाधव, सादिक सय्यद, सोमनाथ पवार, अमोल कदम इ. शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


