
जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊर कुंभारी,संजयनगर येथे आरपीआय शाखा व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळ यांचे वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन उपस्थित महिलांचे हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी बोलताना आरपीआयचे राज्य सचिव दीपकराव गायकवाड म्हणाले की,परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.घर चालवण्यासाठी त्यांनी शेण गोवर्या सरपणासाठी वणवण फिरल्या.बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील.म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी गोवर्या थापत असत. अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्यास करु लागले.त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. माता रमाईंच्या या त्यागमुळेच दीन दलीत समाजाला सुख समृद्धी चे दिवस पहावयास मिळत आहे. भास्करराव वाकोडे यांनी माता रमाई यांना अभिवादन करताना उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. तर मंगलताई आव्हाड यांनी महिलांनी माता रमाईंच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांचा आदर्श घेऊन सुसंस्कृत समाज घडवावा असे सांगितले. यावेळी किसनराव गायकवाड, संजय भालेराव, भीमराज वरशीळ, भाजपा अनु.जाती मोर्चा तालुका सचिव किशोर गायकवाड, विलास धीवर, अमोल गायकवाड,अजहर शेख,प्रदीप गायकवाड,गोपी गायकवाड, निलेश शिंदे, प्रवीण गायकवाड,सुमित पगारे, सागर जगताप,भारत गायकवाड, आकाश साळवे, धीरेन गायकवाड,आकाश पगारे ,सोमेश्वर गायकवाड, अक्षय जगताप, राहुल जगताप, अवि पगारे, मंदाकिनी वाकोडे ,मंगल आव्हाड, कोळेताई, गवईताई, हसविका पगारे यांचे सह भीम साम्राज्य सेना मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी भीम साम्राज्य सेना मित्र मंडळाच्या वतीने सायंकाळी खिरदान कार्यक्रम आयोजित केला असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोमेश्वर गायकवाड यांनी केले.


