
जेऊर कुंभारी वार्ताहर
डॉ.बाबासाहेबांनी कधीही संकटांसमोर हार मानली नाही आणि म्हणूनच आज संपूर्ण जग त्यांना सामाजिक न्यायाचे महान योद्धा, आणि मानवतेचे खरे रक्षणकर्ते म्हणून आदर देते. आपण आज शाळेत शिकतो, मोकळेपणाने बोलतो, आपल्या अधिकारांबद्दल जागरूक आहोत हे सर्व त्यांच्या संविधानामुळेच शक्य झाले आहे. त्यांच्या तत्वांचा स्वीकार केल्यास आपण चांगले नागरिक बनू शकतो आणि आपल्या समाजासाठी चांगली कामे करू शकतो. असे प्रतिपादन आरपीआयचे राज्यसचिव तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दीपकराव गायकवाड यांनी केले. जेऊर कुंभारी संजयनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, आरपीआय शाखा व भीमसाम्राज्य सेनामित्र मंडळाचे वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की डॉ.बाबासाहेबांचे जीवन म्हणजे दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. अंधार कितीही असला तरी हा दीपस्तंभ न्यायाचा, समानतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग उजळत ठेवतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला सर्वात मोठी शिकवण देऊन गेले आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.कारण शिक्षण हेच खरं सामर्थ्य आहे जे भविष्य घडवतं. संघटित राहिलात तर लढ्याचं बळ वाढतं, आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर अन्याय कुठेही डोकं वर काढू शकत नाही. याप्रसंगी स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे, संजीवनी चे माजी संचालक मधुकर वक्ते, भास्करराव वाकोडे, राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव गुरसळ ,पोलीस पाटील बाबासाहेब गायकवाड, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे जाधव दादा यांनी बाबासाहेबांच्या स्मारकास अभिवादन केले.दरम्यान समता सैनिक दलाच्या कोपरगाव युनिटने उपस्थित राहून बाबासाहेबांच्या स्मारकास सलामी दिली. उपस्थित समाज बांधवांनी सामूहिक त्रिसरण, पंचशील पठण करून अभिवादन केले. भीम साम्राज्य सेना मित्र मंडळाचे संस्थापक प्रदीप गायकवाड यांनी दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी संघटनेच्या वतीने मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन फेरीचे आयोजन केलेले असून सर्व समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. यावेळी सतीश पवार ,राहुल गायकवाड ,कुंदन पठारे, शिवराम गायकवाड, संजय आव्हाड, कोंडीबा काकडे, सोपान खरात ,संजय भालेराव,भीमा साळवे, मंगलताई आव्हाड, सुनिताताई दिवे, मंदाताई वाकोडे, सोनूबाई जाधव, मंगलताई शिंदे ,बेबीताई गायकवाड ,कांताबाई कोळे, सुशीला काकडे, लताबाई खरात ,गीताबाई गायकवाड आदी समाज बांधवांसह भीमसाम्राज्य सेना मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष सुमित पगारे, उपाध्यक्ष सागर जगताप ,निलेश शिंदे ,प्रवीण गायकवाड, सागर गायकवाड, स्वप्निल भालेराव, दाविद धीवर, आकाश साळवे,सोमेश्वर गायकवाड, सचिन गायकवाड, विजय भालेराव, रवी पवार,सोमनाथ चव्हाण,आकाश पगारे, निलेश वाकोडे, राहुल जगताप,सोमनाथ जगताप, सार्थक वायकर ,साई दिवे ,सुशांत दिवे आदी उपस्थित होते.


