Tuesday, March 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोपरगावकरांच्या विकासाचे संधान बांधण्यासाठीनेहमीच साथ देणार!! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोपरगावकरांच्या विकासाचे संधान बांधण्यासाठीनेहमीच साथ देणार!! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव शहर विकासासाठी केंद्र व राज्य शासन म्हणून जी जी मदत लागेल ती देऊ, रात्र वै-याची आहे, मतदार म्हणून तुम्ही चुकलात तर पाच वर्षे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, येथील नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक भाजपा, रिपाई मित्रपक्ष, लोक सेवा आघाडीला निवडुन देऊन परागच्या माध्यमातून कोपरगावकरांच्या विकासाचे संधान घालून देण्यांसाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपण येथे आलो असल्याचे प्रतिपादन श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लोकसेवा आघाडी मित्र पक्षाच्या कोपरगांव नगरपालिका उमेदवारांच्या निवडणुक प्रचाराचा नारळ शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते वाढवण्यात येऊन डॉ.बाबासाहेब आंबडेकर मैदनावर जाहिर सभा घेण्यांत आली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर, भाजप पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगांव शहर विकासासाठी भाजपा, रिपाई मित्रपक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने तयार केलेल्या विश्वासनाम्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने प्रकाशन करण्यात आले व त्याच्या परिपूर्तीसाठी पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळवा, शिर्डी कोपरगांव येवला विकासाचा कॉरीडॉर, शहरवासियांना नियमित स्वच्छ पिण्यांचे पाणी, गोदावरी नदीकाठ सुशोभीकरण,रस्ते,वीज,आरोग्य आदि शहर विकासाचे ठराव मांडले.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान याप्रसंगी बोलताना म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पालिकेचा कारभार पारदर्शक करून येथील विकासाच्या प्रत्येक योजना तळागाळातील घटकांपर्यंत पूर्ण क्षमतेने राबवू, शहर हद्द वाढ, पिण्याचे पाण्याची योजना ब सत्ता प्रकार, वाढणारी उपनगरे त्यातून तयार होणाऱ्या मूलभूत समस्या याचे वेळीच निराकरण करू.
माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव पालिका इमारत, वाचनालय, बसस्थानक, पोलीस स्थानक, पोलीस निवासस्थाने, पंचायत समिती इमारत,अग्नीशमन केंद्र इत्यादी विकास कामांसाठी भरीव निधी दिला, येथील शहरवासियांच्या नजरेत भरेल अशी कामे केली व येथुन पुढेही करत राहणार असे सांगुन महिला भगिनींना स्वच्छ व दररोज पिण्याचे पाणी देण्यासाठी आपण सतत काम करत आहोत. विरोधी उमेदवार दुटप्पी आहेत ते आमच्याकडे एक बोलत होते तुमच्याकडे एक बोलतात त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लक्षात घ्यावे असे आवाहन कोल्हे यांनी केले.
जिल्ल्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, पालिका निवडणूक प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री यांची जिल्ह्यात कोपरगांवला पहिली सभा होत आहे, मतदारांनी मनात कुठेही किंतु परंतु न ठेवता विकासाच कमळ म्हणून नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान यांचे सह भाजपा-लोकसेवा आघाडीच्या सर्व तीस नगरसेवकांना बहु‌मताने विजयी करावे. राज्यात १०० पेक्षा जास्त जागा भाजपाच्या बिनविरोध निवडल्या गेल्या हा शुभशकुन आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने जो विजय मिळविला तोच विजय नगरपालिका निवडणुकीत साकारायचा आहे. जिल्ह्यात कमळ फुलवायचे आहे. मुख्यमंत्र्यांचे आम्हाला स्पष्ट निर्देश आहेत त्यामुळे कोपरगावमध्ये फक्त कमळच फुलणार यात कोणीही शंका बाळगू नये.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, वाढत्या नागरिकीकरणांतून शहरीकरणाला ओंगळ स्वरूप प्राप्त होते पण त्यातच विकासाची संधी दडलेली आहे.रोजगाराच्या संधी शहरातूनच येत असतात त्यासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब व शहर केंद्रीत विकासाच्या अनेक संकल्पना उभ्या केल्या आहेत. राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणुन त्या पूर्ण करण्यांसाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत. अटल अमृत योजनेतून सुमारे 30 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत त्यातून शहर बदलत आहे, कोपरगांवकरांसाठी पुर्ण क्षमतेने पाणी देण्यांचे काम आकार घेत आहे; आहिल्यानगर जिल्हयाचे विकासाचे चित्र बदलत आहे. कोपरगावातून जात असलेल्या समृद्धी महामार्गामुळे उद्योगाला चालना मिळत आहे, नवनगरे वसवली जात आहे.
कोपरगाव शहरावर येणाऱ्या प्रत्येक संकटात मदतीला धावून येणारी संजीवनी आहे आणि त्यांना पूर्ण ताकद देऊन. त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. कोपरगांव नगरपालिकेचे माध्यमांतून भाजपा लोकसेवा भाघाडीला अभिप्रेत असणारी जनविकासाची आश्वासने पाच वर्षात पुर्ण करायाची जबाबदारी आमची आहे , थोडक्यांने चुकी कराल तर पश्चातापाची पाळी येईल; मागच्या वेळी नगरसेवक निवडून दिले पण नगराध्यक्ष दिला नाही त्यामुळे कामे करता आली नाही यावेळी ती चूक करू नका कारण स्नेहलता ताई कोल्हे यांना अवघ्या 500 मतांनी थांबावं लागलं त्यामुळे अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिले यासाठी आगामी काळात सर्वच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे भाजपचे आणि मित्र पक्षांचे निवडून द्या असे मुख्यमंत्री म्हणाले.
असे सांगुन त्यांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आणखी एक हजार आजारांचा समावेश करून त्याच्या उपचारासाठी प्रत्येकाची काळजी घेण्यांचे काम करत असुन आहे असे सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!