
जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊर कुंभारी गावातील हरिसन ब्रँच येथे एकता ग्रुप व जेऊरचा राजा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या मंडळाची स्थापना १९७६ मध्ये कै. सुभाष आ. आव्हाड यांनी केली होती. संस्थाचालक यशवंतराव आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यू इंडिया इन्शुरन्सचे मॅनेजर भिमराज वक्ते होते. त्यांनी आपल्या भाषणात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते, असे सांगत प्रत्येक व्यक्तीने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन केले.
महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी या तरुण मंडळाने हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. संजीवनी ब्लड बँकेच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती योगिता पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाला महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे व्हा. चेअरमन राजेंद्र कोळपे, पराग संधान साहेब ,संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक सतिष आव्हाड, माजी संचालक मधुकर वक्ते, सरपंच सुवर्णा पवार, आनंदराव चव्हाण, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, यशवंतराव आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
एकता ग्रुप व जेऊरचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष ऋषिराज रोहम, उपाध्यक्ष श्रीहर्ष दौंड यांच्यासह सदस्य ऋषिकेश आव्हाड, मंगेश सावंत, कार्तिक दौंड, यश दळवी, आदित्य भोसले, अजिंक्य दळवी, परिमल आव्हाड, यश देवकर, हर्ष आव्हाड, कवितेज वक्ते, तेजस वक्ते, योगेश दादडे, मयूर टेके, आदित्य दळवी, कुणाल दळवी, अंकित आव्हाड, तिर्थ दौंड, गोकुळ वक्ते, जयदेव आव्हाड आदी सक्रिय होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन जालिंदर चव्हाण यांनी मानले.


