Friday, April 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedचार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीचे काम पूर्णलवकरच पाणी पुरवठा पूर्ववत!!-...

चार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीचे काम पूर्णलवकरच पाणी पुरवठा पूर्ववत!!- आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या चार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीचे पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेला कालावधी आठ दिवसाचा होता. त्या कालावधीत दिलेले काम पूर्ण झाले असून सुरु असलेल्या आवर्तनातून सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरतील व कोपरगाव शहरातील नागरीकांना पुन्हा नियमितपणे पूर्ववत पाणी पुरवठा होणार आहे अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरातील नागरीकांच्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सबंधित असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.०५) रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी शहरातील विविध नागरी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने हजेरी लावली.या जनता दरबारात शहरातील नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. यामध्ये पाणी पुरवठ्याच्या बाबत देखील नागरिकांच्या आलेल्या तक्रारी ऐकून घेत त्यांनी सांगितले की, चार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीचे पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. २०० अश्व शक्तीच्या वीज पंपाच्या माध्यमातून दोन दिवसात जवळपास अर्धा म्हणजेच पन्नास टक्के ५ नंबर साठवण तलाव भरण्यात येणार आहे व उर्वरित नेहमीच्या पद्धतीने भरण्यात येणार आहे त्याचा फायदा चार नंबर साठवण तलावाला देखील होणार आहे. चार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीचे काम पूर्ण झाले असून सुरु असलेल्या उन्हाळी आवर्तनातून चार व पाच नंबर साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून मिळतील.मागील आवर्तनाच्या वेळी पाटबंधारे विभागाला पाण्याची मोठी तुट सोसावी लागल्यामुळे विलंब झाला त्यामुळे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले गेले नाहीत. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. परंतु यावेळी मागील आवर्तनाच्या तुलनेत या आवर्तनासाठी सिंचनासाठी क्षेत्र काहीसे कमी आहे व मागील आवर्तनावेळी आलेल्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून मिळतील. व पुन्हा नागरीकांना नियमितपणे पूर्ववत पाणी पुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोपरगाव शहरातील प्रलंबित विकास कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी मांडल्या. त्यावेळी ते म्हणाले की, कोपरगाव शहरासाठी दिलेल्या निधीतून अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याबाबत ठेकेदारांची देखील लवकरच बैठक घेणार आहे. सबंधित ठेकेदार आपल्याकडील कामे किती दिवसात पूर्ण करणार याबाबत सविस्तर खुलासा घेवू, जेणेकरून नवीन विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध होतांना हि कामे घेवून पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी योग्य ती काळजी घेवून पहिली कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सबंधित ठेकेदारांना रीतसर कोपरगाव नगरपरिषदेकडून नोटीसा देण्यात येतील. त्याबाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला सूचना केल्या आहेत. सर्व तक्रारींना गांभीर्याने घेत अधिकाऱ्यांना त्यांनी त्वरित कार्यवाहीचे आदेश देतांना ते म्हणाले की, जनतेच्या समस्या ऐकणे आणि त्यावर तातडीने उपाय करणे हे माझे कर्तव्य आहे. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे अत्यंत गरजेचे असून यापुढे नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप, राष्ट्रावादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक व नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!