Thursday, April 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedवीर एकलव्य यांचे स्मारक उभारणे ही अभिमानाची बाब!!- कल्याणराव गुरसळ

वीर एकलव्य यांचे स्मारक उभारणे ही अभिमानाची बाब!!- कल्याणराव गुरसळ

जेऊर कुंभारी वार्ताहर

आदिवासी बांधवांचे दैवत आद्यपुरुष एकलव्य यांचे स्मारक व राजपूत (कऱ्हेकर) समाजाचे दैवत वीर महाराणा प्रताप यांचे स्मारक उभारण्यात यावे यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली असून लवकरच एकलव्य यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. ही अभिमानस्पद बाब असल्याचे जेऊर कुंभारी येथील समाजीक कार्यकर्ता कल्याण गुरसळ
यांनी प्रतिपादन करून आ.काळे व अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.
महाराष्ट राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल दि.१० ऑगस्ट रोजी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत महिला मेळाव्यात महिला भगिनींशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी आदिवासी बांधवांचे दैवत आद्यपुरुष एकलव्य
यांचे स्मारक लवकरात लवकर उभारण्यात येईल अशी घोषणा केली. एकलव्य यांचे स्मारक व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे प्रयत्नशील होते.
एकलव्य यांचे स्मारक उभारणे हे आदिवासी समाज्यासाठी अभिमानाची बाब आहे. एकलव्य यांचे समाज्यासाठी मोठे योगदान आहे. कल्याणराव गुरसळ यांनी सांगितले की वीर एकलव्य हे जन्मतः थोर धनुर्धारी नव्हते.किंवा त्यांना कोणत्याही गुरूकडून थेट प्रशिक्षणही मिळाले नाही.आपल्या जिद्दितून आणि कठीण परिश्रमातून तसेच स्वयं अध्ययानातून त्यांनी धनुर्विविद्येचे कौशल्य आत्मसात केले आणि थोर धनुर्धारी बनले.खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवन चरित्रातून धेय्य प्राप्तीसाठी कठीण मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्नांची शिकवण मिळते असे सांगितले.
कोपरगाव तालुक्यात एकलव्य यांचे स्मारक उभारले गेले तर आदिवासी समाज आमदार आशुतोष काळे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदादा पवार यांचे ऋणी राहतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!