Friday, April 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedअन्यथा कोपरगाव शहराला पुढेही भविष्यात दहा दिवसानीच पाणी मिळेल !!-माजी. नगराध्यक्ष मंगेश...

अन्यथा कोपरगाव शहराला पुढेही भविष्यात दहा दिवसानीच पाणी मिळेल !!-माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव प्रतिनिधी

       जुलै महिना सुरू झाला असून दोनच दिवसापूर्वी नगरपालिकेने ४ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा हा पत्रक काढून १० दिवसाआड केला. काही भागात तर तो १२ दिवसाआड होईल .
           यामुळे शहरातील महिला भगिनींची अचानक नगरपालिकेने पाण्याच्या दिवसाच्या दिवशी असे पत्र काढल्याने पाणी साठवणुकीसाठी मोठी धावपळ व तारांबळ झाली.
            सध्या ५ नंबर नवीन साठवण तलावाचे येसगाव येथे काम चालू असून ,त्याच्या चारही बाजूला काँक्रीटच्या भिंती उभारण्यात आल्या. परंतु या तळ्याच्या तळात माती व प्लास्टिकच्या कागद अस्तरीकरणासाठी टाकला. शासनाने शहराचे पाणी योजनेसाठी १३१ कोटी रुपये मंजूर केले होते. हे पैसे नागरिक जे कर भरतात व पट्टी भरतात यातूनच खरे शासन हे नागरिकांच्या सोयीसाठी हे पैसे देत असतात.  यामुळे जनतेवर उपकार केले असे होत नाही. हे शासनाचे कर्तव्यच आहे .खरे तर आपली नगरपालिका कमी पडली शासनाकडे निधी मागण्यासाठी म्हणून आज पर्यंत शहरास पाण्यासाठी माता-भगिनींना, मुलांना नागरिकांना कधी कधी तर महिन्यातून एकदाच पाणी मिळाले असे अनेक वर्ष त्रास हा नागरिकांना केवळ जागा असताना सुद्धा तळे होण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे त्रास वर्षानुवर्ष सहन करावा लागला.
        कोपरगाव शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे .शहराच्या हद्दीमध्ये लगत असलेले छोटे छोटे भाग हे जोडले गेलेले आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढत चाललेली आहे. त्यामुळे या तळ्याच्या तळ्यात काँक्रिटीकरणच व्हायला पाहिजे होते. असे न झाल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाकीत पाणी भरल्यानंतर दाब आल्यावर चार चार , पाच पाच किलोमीटर पर्यंत पाणी पाझरून  जाणार आहे आणि तळे रिकामी होणार. 

त्यातच नाशिक भागातील धरणांमध्ये जिथून आपल्याला पाणी येतं तिथे मोठ्या प्रमाणात शहरे वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण पडत आहे व आपले पाणी हे कमी होत चालले आहे. धरणातील पाण्यावर आरक्षण पडल्यामुळे शेतीसाठी त्यांना जे पाणी येतं त्याचे रोटेशन लांबत चाललंय .त्यामुळे आपल्याला तळ्यात पाणी मिळणे साठी उशीर होणार आहे आणि पाणी पर्कुलेट झाल्यामुळे पाणीसाठा कमी होणार आणि शहरवासीयांना हे तळे जरी पूर्ण झाली तरी इथून पुढच्या भविष्याच्या ५ , १० , १५ दिवसाआड असेच गढूळ पाणी अस्वच्छ पाणी मिळत राहणार यासाठी नगरपालिकेने अजूनही सप्लीमेंट्री काँक्रिटीकर नाच्या निधीसाठी शासन दरबारी तात्काळ प्रयत्न करून तो मिळवावा व काँक्रिटीकरण जनतेच्या हितासाठी करावे जे करणे आत्ताच शक्य आहे. अन्यथा भविष्यात परत काँक्रिटीकरण होऊ शकणार नाही व जनतेचे असेच हाल वर्षानुवर्ष होत राहणार .
काँक्रिटीकरण केल्यामुळे पाणी स्वच्छ राहील तळे धुता येईल स्वच्छ करता येईल ठेवता येईल. असे न झाल्यास याचा निगेटिव्ह परिणाम कोपरगाव शहराच्या वाढीवर, विकासावर , व्यापारावर निश्चित विपरीत होणार.
तरी अजून वेळ गेलेली नाही नगरपालिकेने शासन दरबारी प्रयत्न करून तळ्याच्या तळामध्ये काँक्रिटीकरणाचे अस्तरीकरण करावे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!