Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedअगत्य कृषी पर्यटनकेंद्र बसवंत कृषी पर्यटन पुरस्काराने सन्मानित!!

अगत्य कृषी पर्यटनकेंद्र बसवंत कृषी पर्यटन पुरस्काराने सन्मानित!!

कोपरगाव प्रतिनिधी

एक आदर्श कृषि उद्योग पर्यटन म्हणून कुलकर्णी यांना बसवंत कृषी पर्यटन पुरस्कार नाशिक येथे
दि. १७ मे २०२४ रोजी देण्यात आला.
आपल्या कृषी पर्यटन केंद्रातून ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती, सामाजिक व सांस्कृतिक सलोखा आणि मुख्य म्हणजे पर्यावरण संवर्धन या बाबत मोलाचे कार्य होत आहे. आपल्या ह्या कार्यातून कृषी पर्यटन क्षेत्रास निश्चितच प्रोत्साहन मिळते.
सुनिल कुलकर्णी , मुलगा चैतन्य कुलकर्णी, बंधू संजय कुलकर्णी यांनी आपल्या १५ ते १६ एकरा मध्ये कृषी पर्यटन स्थळाची निर्मिती करून शेतक-यां पुढे एक आदर्श निर्माण केलाआहे.
लहानपणापासून शेतीव्यवसायाची आवड असणाऱ्या कुलकर्णी यांनी पोटच्या मुलाप्रमाणे झाडांचे संगोपन व संवर्धन केले त्यांना वृक्षां विषय आत्मियता होती. सावळीविहीर येथील शेती कृषीफॉर्म या ठिकाणी विविध फुलझाडे, नारळ,आंबा चिक्कू अशा,जातींचे फळ झाडांची लागवड केली.
सुनिल कुलकर्णी यांनी हे कृषी केंद्र पर्यटनसाठी खुले केले असुन अल्पावधीत अगत्य कृषी पर्यटन केंद्र या नावने हे स्थळ महाराष्ट्राच्या कानाकोपयात प्रसिद्ध झाले आहे.
हे पर्यटन स्थळ बघण्यासाठी नाशिक,औरंगाबाद, पुणा, या भागातील नागरीक येऊन भेट देत असतात. पर्यटकांचेे मन रमण्यासाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घोडागाडी, नॅरीकेशन टाॅवर, रेन डान्स,बोटींग, स्विमिंग पुल,
नर्सरी व बियाणांची माहिती ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.तसेच नर्सरीची स्थापना करण्यात आली.त्यात विविध जातींचे फुलझाडे,फळझाडे असल्यामुळे कृषी केंद्रे पर्यटकांचे मन मोहन करणारे आहे. तसेच विद्यार्थी गेट टु गेदर करण्यासाठी येत असतात.तसेच पर्यटकांसाठी हुरडा पार्टी सुरू केली आहे.तसेच येथील गावरानाची चव न्यारी आहे तेव्हा पर्यटकांनी गावरान जेवनाचा आनंद घेण्यासाठी अगत्य कृषी पर्यटन स्थळाला भेट द्यावी अश्या आकर्षक पर्यटन स्थळाची निर्मिती केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!