Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedनागरीकांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात व्यस्त रहावे!!- संचालक मधुकर वक्ते

नागरीकांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात व्यस्त रहावे!!- संचालक मधुकर वक्ते

जेऊर कुंभारी वार्ताहर

प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणानंतर कौटूंबिक जबाबदारी येते त्यातून नौकरीची धडपड सुरू होते, पुढे सेवानिवृत्ती होते. मनुष्याने सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात व्यस्त रहावे असे प्रतिपादन महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक मधुकर वक्ते यांनी केले.  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या फिटर बाॅयोलींग हाऊस या पदावर वक्ते
सेवानिवृत्त झाले त्याबद्दल महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक मधुकर वक्ते, सोपानराव वक्ते, कोंडीराम वक्ते , शशिकांत वक्ते यांनी श्रफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या फिटर बाॅयोलींग हाऊस विभागात २७ वर्षे अत्यंत जबाबदारीने काम केले त्यातून असंख्य मित्र परिवार जोडला. सत्कारास उत्तर देतांना रामभाऊ वक्ते म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाची उभारणी केली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी या संस्थेचा नावलौकिक वाढविण्यावर भर देत कामगारांसाठी त्यांची सातत्याने सुरु असलेली धडपड हीच आमच्या सेवानिवृत्तीनंतरची मोठी पुंजी आहे, त्यांच्या कार्यातूनच कोपरगांव तालुक्याच्या प्रत्येक अडचनीत मार्ग सापडत असतो.
सुत्रसंचालन शशिकांत वक्ते यांनी केले व आभार सोपानराव वक्ते यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!