Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedमानव जातीच्या कल्याणासाठी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे!!-विवेकभैय्या कोल्हे

मानव जातीच्या कल्याणासाठी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे!!-विवेकभैय्या कोल्हे

जेऊर कुंभारी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

            घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या उपदेशातून समाजाला मोठा विचार दिले, ते सर्वांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी केले. 
          तालुक्यातील जेऊर कुंभारी( संजयनगर) येथे भीमसम्राज्य सेनेच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
        ते पुढे म्हणाले की आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार व्हायचे असेल तर त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आचरणात  आणायला हवे. आजची युवा पिढी या विचाराचे वारसदार झाली तरच पुढील पिढी सक्षम होईल व आपल्या देशाचे महासत्तेचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.
    भारतीय बौद्ध महासभेचे शांताराम रणशूर शुभेच्छा देताना म्हणाले की,  डॉ. बाबासाहेबांनी सर्वांना मताचा अधिकार देऊन खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित केली  व  भीमसाम्राज्य मित्र मंडळ खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार घेऊन विविध स्तुत्य उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. 
           संघटनेचे आधारस्तंभ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड यांनी महापुरुषांच्या विचारांचे आचरण केल्यास मानवी जीवन समृद्ध बनते. त्यामुळे युवकांनी विविध महापुरुषांचे विचार अभ्यासले पाहिजे व अंगीकारले पाहिजे असे मत व्यक्त केले.
           भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की समाजामधील जात भीत नष्ट करून सर्वांनी एकोप्याने राहावे हा मोलाचा संदेश यानिमित्ताने दिला तसेच विवेक भैय्या कोल्हे सामाजीक कामाचे आदर्श तरूणांनी घेतला पाहीजे असे सांगितले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे,संघटनेचे मार्गदर्शक भास्कर वाकोडे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, माजी संचालक मधुकर वक्ते आदींनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमात प्रथम विवेक कोल्हे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यू इंडिया इन्शुरन्स मॅनेजर भिमराज वक्ते तर स्वागताध्यक्ष आर पी आय चे प्रदेश सचिव तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड होते.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन भिम सम्राज्य सेना मित्रमंडळाचे संस्थापक प्रदीप गायकवाड यांनी केले.
यावेळी माजी सभापती शिवाजी वक्ते,
गौतम बँकेचे संचालक बापूराव वक्ते,महेंद्र वक्ते,माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, कल्याणराव गुरसळ,
जनार्दन स्वामी पतसंस्थेचे चेअरमन आनंदा चव्हाण , पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन सुरेश पगारे, संदेश भोंगळे,पत्रकार बिपीन गायकवाड, क्रंतिगुरू सोशल फाऊंडेशन चे अनिल पगारे यांसह अनेक मान्यवर ग्रामस्थ व भीमसैनिक यांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमानंतर भीम साम्राज्य सेनेच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमस्थळी व स्मारकाला निलेश शिंदे,विशाल बारसे,किशोर बारसे यांच्या टीम ने केलेल्या सुशोभीकरणाचे सर्वांनी कौतुक केले.सायंकाळी भीम प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिमसाम्राज्य सेना अध्यक्ष सागर गायकवाड, कार्याध्यक्ष सुमित पगारे,उपाध्यक्ष दावीद धीवर, सागर जगताप,स्वप्निल भालेराव, रवी पवार, सचिन गायकवाड,अजय गोरसे, प्रवीण गायकवाड,अजय पवार,राज भालेराव,नितीन वाकोडे,धम्मानंद जगताप,बबलू भालेराव,अवी पगारे,राहुल गायकवाड,बाबू शिंदे,पप्पू गायकवाड,आकाश पगारे, अमोल जगताप, महेश गायकवाड, सोमनाथ जगताप,धीरज आव्हाड,आकाश साळवे,गौतम गायकवाड,बाळू साळवे,आदेश माळी,गौरव गायकवाड, धीरज आव्हाड, मझहर शेख,संतोष चव्हाण,भारत गायकवाड, बाळू गवई,अमोल चव्हाण,आदींसह भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!