Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिर्डीची उमेदवारी काँग्रेसलाच मिळावी!!-राजेंद्र वाघमारे

शिर्डीची उमेदवारी काँग्रेसलाच मिळावी!!-राजेंद्र वाघमारे

कोपरगाव प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक दिग्गज रिंगणात उतरले असताना जागा वाटपाचा तिढा अजुनही सुटेना आचारसंहिता लागुन आज दहा दिवस उलटले तरी जागा वाटपाचे भिजत घोंगडे असेच राहिल्याने उमेदवारापुढे यक्षप्रश्न निर्माण होताना दिसत आहे मतदानाची तारीख जवळ येत आहे आणि उमेदवाराजवळ खूप अल्प वेळ आहे जरी जागा वाटपाचा तिढा सुटला तरी शिर्डीची उमेदवारी काँग्रेस उमेदवाराराच मिळावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष तथा शिर्डी लोकसभा मतदार संघांचे कॉग्रसचे इच्छुक उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी केली आहे.
२०२४ लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, ही निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष आपापल्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. केद्रातील सत्ता टिकविण्यासाठी विरोधकांना नमविण्याची रणनीती,संभाव्य अर्थात,तगड्या उमेदवारांची चाचपणी आणि पक्षातर्गंत वादाचे आव्हान मोडून भाजपा ,कॉग्रेस ,शिवसेना दोन गट ,राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन गट , रिपाई ,वंचित आदीसह विविध पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहे मात्र यात सुशिक्षित तरुणांनाचा अभाव दिसून येत असून बौद्ध समाजाला कोठे ही स्थान दिसत नसल्याची खंत राजेंद्र वाघमारे यांनी व्यक्त केली .
राजेंद्र वाघमारे पुढे म्हणाले की , महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून या ४८ जागावर विजयी मिळविण्याकरिता विविध राजकिय पक्षांनी कंबर कसली आहे .यात शिर्डी लोकसभा मतदारसंघ असून हा मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव असल्याने २००९ पासून एकाच समाजाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे .शिर्डी मतदार संघातून भाऊसाहेब वाकचौरे हे २००९ ला शिवसेनेकडून विजयी झाले.मात्र राजकिय क्षितीजावर कोणाला कोठे जायचे बंधन नसल्याने वाकचौरे यांनी २०१४ कॉग्रेस कडून निवडणुक लढविली मात्र १५ दिवसात आलेले लोखंडे यांनी बाजी मारली ते आजपर्यत मात्र राजकिय प्रवाहात गट बाजी निर्माण होवून शिवसेना , राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने राज्यात राजकारणाची खिचडी झाली.त्यामुळे इच्छुकांची मनधरणी करण्यात संध्या पक्षाचे जेष्ठ नेते दिसत आहे . शिर्डी मधील खासदार असणारे लोखंडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटात वाकचौरे दाखल झाले तर काही दिवसात शिदे गटात श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे दाखल झाल्याने उमेदवारीकरिता स्पर्धा निर्माण झाल्या त्यात मनसे सुद्धा युती आल्याने त्यांनी ही शिर्डीची जागा युतीकडे मागितली .
यात असे दिसते की काना मागून आले आणि तिखट झाले. शिर्डी मतदार संघात बौद्धांची मोठी संख्या असल्याने या समाजाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार नसल्याचे संध्या तरी चित्र दिसत आहे .
गेल्या अनेक वर्षापासून शिर्डी मतदार संघात अनेक समस्यामधून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे केवळ मोदीचा चेहरा पाहून जर निवडणुका होत असेल तर त्या मतदार संघाचा सर्वागीण विकास होणे ही महत्वाचे आहे मात्र तसे दिसले नाही काही ग्रामिण भागात खासदार कोण आहे हेचं माहित नाही.तर निवडणुकामधून तेच ते चेहरे उमेदवारीकरिता चमकले जात आहे तेव्हा सर्वसामान्य , सुशिक्षीत, तरुणांना संधी कधी मिळणार हे पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी श्री.वाघमारे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!