


प्रत्येक उपक्रम, स्पर्धा,
इत्यादींमधिल सहभागाने संघ भावना, व्यवस्थापन कौशल्ये, एकमेकांना जाणुन घेण्याची, हारजीत पचविण्याचे, असे कळत नकळत विविध व्यक्तिमत्वाच्या
पैलूंची जडणघडण होत असते. म्हणुन प्रत्यकाने प्रत्यक ठिकाणी यश
अपयशाची तमा न बाळगता सहभाग घेऊन जीवन यशस्वी करावे असे
प्रतिपादन कोपरगांव शहर पोलिस स्टेशन चे मुख्य निरीक्षक श्रीमान प्रदीप देशमुख साहेब यांनी संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक
प्रदीप देशमुख साहेब, श्री. संदीप कोळी साहेब(निरीक्षक कोपरगांव ग्रामीण) उपस्थित होते! या ४३ व्या गॅदरिंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे होते तसेच संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ रेणुका ताई कोल्हे,परागजी संधान, सौ. संधान, संचालक संजयराव होन, सेक्रेटरी श्री. भिंगारे साहेब, संस्था मुख्य अधिकारी प्रदीप गुरव साहेब, प्राचार्य मोहसिन शेख सर, अकॅडमी हेड हरिभाऊ नळे, मान्यवर यावेळी उपस्थित होते. या वर्षी शाळेने सिनेमेनिया ही थिम ठेऊन के. जी.. ते इयत्ता ९ वी पर्यंत च्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.कार्यक्रमाची
सुरुवात सरस्वती पूजन, आदरणिय कै.माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली होती. शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे यांनी आपल्या भाषनात शाळेतील शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक मध्ये तालुका, जिल्हा, विभाग, राज्य स्पर्धा परीक्षेत सुयश प्राप्त केल्या बद्दल संबंधित विदयार्थी, पालक यांच्या सोबत नव्याने रुजू झालेले प्रिन्सिपॉल मोहसिन शेख सर,शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे भरभरून कौतुक केले.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे देशमुख साहेब यांनी सुध्दा विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ही बाब विषेश असल्याचे सांगितले, संदिप कोळी साहेब यांनी सुध्दा विद्यार्थ्यांचे, सर्व शाळा मॅनेजमेंट यांचे,शिक्षकांचे मनभरून कौतुक केले होते. विविध नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा विदयार्थी यांनी मिळवली होती.आपल्या अध्यक्षीय भाषणात संजवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे बोलले मी स्वतः या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आमच्या वेळी शाळा होती पण आज ही शाळा खुप प्रगती पथावर आहे त्यामुळे निश्चित भविष्यात शाळा खुप विदयार्थी घडवेल असे सांगितले! जवळ पास ३०० बक्षीस वितरण करण्यात आली होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या विद्यार्थ्यांनी कुमारी श्रावणी महाले आणि प्रियल लोखंडे यांनी केले.
आपल्या आभार प्रदर्शन भाषनात प्राचार्य मोहसिन शेख सर यांनी संस्था आज खुप प्रगती पथावर असल्याचे सांगितले.. शेवटी क्रीडा मार्गदर्शक अनुप गिरमे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक वृंद यांनी वंदे मातरम् घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली पूर्ण शाळेला विद्युत रोषणाई करण्यात आली होती.इयत्ता १० वी चे सर्व विद्यार्थी स्वागतासाठी हजर होते.उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक मोहसिन शेख यांनी मानले.


