Sunday, April 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन आपले जीवन उज्वल करावे!!- शिवाजीराव वक्ते

विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन आपले जीवन उज्वल करावे!!- शिवाजीराव वक्ते

जेऊर कुंभारी वार्ताहर

शिक्षण हे विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करते विद्यार्थ्यांना शिक्षणामुळे चांगले गोष्टी साध्य करता येते तसेच शिक्षणामुळे सामाजिक व कौटुंबिक आदर वाटतो तसेच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता येते असे प्रतिपादन माजी सभापती शिवाजीराव वक्ते यांनी कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील पवार वस्ती येथे विर एकलव्य यांच्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले .
यावेळी विर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती शिवाजीराव वक्ते,महर्षी शंकराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक मधुकर वक्ते,संचालक सतिषराव आव्हाड, संचालक बाळासाहेब वक्ते,जेऊर कुंभारी गावच्या सरपंच सुवर्णा पवार
मा.सरपंच रमेश वक्ते, मा.सरपंच यशवंतराव आव्हाड, संजय शांतीलाल वक्ते यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी संचालक मधुकर वक्ते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाभारतात वीर एकलव्यांचे विशेष महत्त्व आहे. जेव्हा गुरू शिष्याची चर्चा केली जाते.तेव्हा एकलव्य व द्रोणाचार्य यांची नावे आर्वजुन घेतली जातात पूर्वीच्या काळी गुरुकुल आश्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात असत.एकलव्य हे भिल्ल आदिवासी समाजाचे होते.त्यांनी गुरू द्रोणाचार्य यांचा पुतळा बनवून त्याची पूजा करत सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनून दाखवले. त्यांची गुरूवर अपार श्रद्धा होती. गुरू द्रोणाचार्य यांनी गुरूदक्षिणा म्हणून वीर एकलव्य यांचा अंगठा मागितला होता.तेव्हा मागे पुढे काहीही विचार न करता एकलव्याने आपल्या हाताचा अंगठा दिला.तेव्हा पासून वीर एकलव्य यांना श्रेष्ठ शिष्य म्हणून ओळखले जात आहे.
या कार्यक्रम प्रसंगी, माजी सभापती शिवाजीराव वक्ते,महर्षी शंकराव कोल्हे कारखान्याचे माजी संचालक मधुकर वक्ते,संचालक सतिषराव आव्हाड, संचालक बाळासाहेब वक्ते,जेऊर कुंभारी गावच्या सरपंच सुवर्णा पवार
मा.सरपंच रमेश वक्ते, मा.सरपंच यशवंतराव आव्हाड, संजय शांतीलाल वक्ते,बाबासाहेब पवार ,सतिष पवार सतिष सुरेश पवार, विलास मोरे, संदीप पवार, श्याम पवार, प्रवीण पवार ,किशन पवार ,शुभम पवार, सागर गांगुर्डे ,रवींद्र गायकवाड, विनीत पावशे, उदय पवार, सुभाष पवार, भाऊसाहेब पवार, सुरेश पवार ,दिलीप पवार, रमेश पवार, शिरीष पवार ,दत्तू पवार ,ऋषी सोनवणे, समीर मोरे, आदित्य मोरे, गणेश माळी ,सतीश माळी, रवींद्र पवार, श्रीनाथ पवार, आकाश पवार, अशोक पवार ,सिद्धार्थ, पावशे भास्कर पवार ,निखिल माळी,नितीन थोरात,अनिल वाघ, गणेश वाघ ,आरती पवार ,जयश्री मोरे, निकिता पवार, अंजली पवार, रांजण मोरे ,सेजल पवार ,सुनंदा पवार,योगेश सोनवणे प्रमिला पवार,निलेश जायभाय,छाया पवार,
तसेच समस्त अंबिका तरुण मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता विर एकलव्य यांचा आरतीने झाली.सुत्रसंचालन सतिष पवार यांनी केले व आभार विलास मोरे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!