
कोपरगाव प्रतिनिधी
राहाता तालुक्याची कामधेनू वाचविण्यासाठी कोपरगावचे युवा नेतृत्वाला सभासदांनी स्वीकारले अन एकहाती सत्ता कोल्हे आणि थोरात यांना दिल्याने त्यांच्या नेतृत्वाला आधीच सुरुंग लागला आहे, त्यांच्या कार्यकर्त्याना या युवा नेत्याची आता भीती वाटू लागली, त्याच भीती पोटी कार्यकर्त्याना ब्रम्हराक्षस दिसू लागला आहे, त्यामुळे युवा नेतृत्व विवेक कोल्हे यांना राहत्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करू दिले नाही. मात्र युवा नेतृत्व विवेक कोल्हे हे विकास वादळ आता आणखी जोमाने घोंगावत राहिल असा विश्वास अनिल बोठे यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोठे असे म्हणाले की, राहाता तालुक्याची कामधेनू जगवण्यासाठी स्व. शंकरराव कोल्हे यांनी कायम प्रयत्नशील राहीले होते. यासाठी सभासदांनी कायम स्व. कोल्हे यांच्याकडे आग्रह धरत होते. त्यानंतरच्या काळात गणेश ज्यांच्याकडे गेला त्यांनी गणेशच्या मालकांना दारात उभं करण्याचे काम केले. हा राग धरत सभासदांनी स्व. कोल्हे यांचे नातू युवा नेते विवेक कोल्हे यांचे नेतृत्व स्वीकारलं. आणि त्यांना एकहाती सत्ता देखील दिली. यामुळे विरोधकांच्या खुर्चीलाच सुरुंग लागल्याची वार्ता महाराष्ट्रात पसरली. विवेक कोल्हे यांना राहाता तालुक्यातील लोक खमके नेतृत्व म्हणून ओळखु लागले. त्यांची प्रशासकीय कामाची पद्धती आणि गती पाहून सभासदाना आधार मिळू लागल्याने विरोधकांच्या कार्यकर्त्याना देखील विवेक कोल्हेच्या कामाच्या भीतीपोटी ब्रम्हराक्षस दिसू लागले आहे. त्या कार्यकर्त्याना आता वाटू लागले आहे की, कोल्हेचं हे नेतृत्व स्थानिक स्वराज्य निवडणुकीत उतरले तर पुन्हा चारी मुंड्या चित करण्याची भीती त्यांना वाटू लागली आहे. याच वैमानस्यातून विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी राहत्यातील वीरभद्र मंदिरासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा नेतृत्व विवेक कोल्हे अभिवादन करण्यासाठी विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांना अभिवादन करू न देण्याचे काम विरोध करण्याचे काम राजनैतिक पद्धतीने केला आहे. महाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी आलेल्या मावळ्याला मुजरा करू न देण्याचे पाप हे विघ्नसंतोषी मंडळी करू लागले आहेत, अशा अपप्रवृत्तीचा तीव्र निषेध करतो, असे अनिल बोठे यांनी सांगितले.


