Sunday, April 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात सुनिता इंगळे (सूर्यवंशी) यांचा द्वितीय क्रमांक!!

जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात सुनिता इंगळे (सूर्यवंशी) यांचा द्वितीय क्रमांक!!

कोपरगाव प्रतिनिधी

दि.१ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) व गणित-विज्ञान अध्यापक संघ द्वारा ५१ वे जिल्हास्तरीय गणित -विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन माधव लॉन,कल्याण बायपास,अहमदनगर येथे करण्यात आले होते.या प्रदर्शनात सुनिता इंगळे यांनी प्राथमिक शिक्षक गटात शैक्षणिक साहित्य निर्मिती अंतर्गत ”वेस्ट इज बेस्ट – प्रथम प्राधान्य सिक्स सी ला,शैक्षणिक साहित्य जोडीला ‘ या उपक्रमात पन्नास प्रकारचे शैक्षणिक साहित्य निर्मिती केली होती.संपूर्णतः टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ साहित्य निर्मिती करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा परिषद अहमदनगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,उपशिक्षणाधिकारी बुगे, नगरपालिका व मनपा प्रशासनाधिकारी रमजान पठाण,जिल्हा गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय निक्रड,जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष बद्रीनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.
वर्गात अध्यापन करताना सातत्याने नवनवीन प्रयोग त्या राबवत असतात.वर्गातही अध्यापन करताना विद्यार्थ्यांना अभ्यासातील संकल्पना साहित्याच्या मदतीने समजावून देत असतात.सन २०११ पासून त्या सातत्याने या प्रदर्शनात सहभाग घेऊन तालुकास्तर,जिल्हास्तर,राज्यस्तरांपर्यंत त्यांनी यश मिळविले आहे. त्यांच्या शैक्षणिक साहित्य स्टाॕलला शिक्षक व विद्यार्थी यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.नुकत्याच जिल्हास्तरीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,संगमनेर आयोजित नवोपक्रम स्पर्धेत ही त्यांच्या प्रयोग इंग्रजी अध्यापनातले-इंग्रजी वर्ड वाॕल या नवोपक्रमास जिल्हास्तरीय सादरीकरणाची संधी मिळाली. उतारावाचन उपक्रम संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहे. शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान नसतानाही फक्त विद्यार्थी गुणवत्ता विकास हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्या सातत्याने स्वखर्चातून साहित्य निर्मिती करत असतात.विद्यार्थी अध्ययनातील समस्या लक्षात ठेवून साहित्य निर्मिती असल्याने ते विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहे.शैक्षणिक साहित्य निर्मितीत त्यांचा हातखंडा असून राज्यात एक नवी ओळख निर्माण केली आहे.लाॕकडाऊन कालावधी ते आतापर्यंत विविध शाळांना उपयुक्त असे स्वलिखित ‘शालेय परीपाठ प्रश्नमंजुषा’ या पुस्तकाच्या वीस हजार रुपये किंमतीच्या तीनशे प्रती त्यांनी मोफत भेट दिल्या आहेत. त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी तालुक्यातील दिडशे शिक्षकांना त्यांचे स्वलिखित पुस्तक सस्नेह भेट दिले आहे. सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत त्यांचे उपक्रम चालू असतात.गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,न.पा.शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात,सर्व विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, राज्यभरातील,जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील शिक्षक- शिक्षिका,शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना निंबाळकर,सविता साळुंके,आरती कोरडकर,अरुण पगारे,पालक,विद्यार्थी यांनी या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!