Sunday, April 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedरेनबो शैक्षणिक संकुलात अवतरले साक्षात "कर्तव्यपथ पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे साहेब

रेनबो शैक्षणिक संकुलात अवतरले साक्षात “कर्तव्यपथ पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे साहेब

जेऊर कुंभारी वार्ताहर

    शिक्षण महर्षी लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी येथे देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी, प्रमुख  अतिथी  कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. रोहिदासजी ठोंबरे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे सचिव मा. संजयजी नागरे सर, विश्वस्त मा. आनंदजी दगडे सर,कार्यकारी संचालक मा. आकाशजी नागरे सर, शैक्षणिक संचालक  मा. नानासाहेब दवंगे सर,  उपप्राचार्य  निलेश औताडे सर, कार्यालयीन प्रमुख श्री रवींद्र साबळे सर, पालक शिक्षक संघाचे सदस्य  ज्ञानेश्वर थोरे, पत्रकार मनीष जाधव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख अतिथी मा.ठोंबरे साहेब यांचे सकाळी ठीक ९.३० वा. रेनबो शैक्षणिक संकुलात  आगमन झाले. शाळेच्या प्रवेशद्वारावरच त्यांचे स्वागत करून बँड पथका समवेत  विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पथसंंचलन करीत प्रमुख अतिथींना  कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.
   प्रमुख अतिथी मा. ठोंबरे साहेब यांनी प्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर  त्यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय तिरंगा ध्वज  फडकताच विद्यार्थ्यांनी  राष्ट्रगीत व ध्वजगीत गाऊन उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
    प्रजासत्ताक दिनाचे प्रास्तविक सादर करताना दत्ता डोखे म्हणाले की प्रत्येक नागरिकाने मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी देशासाठी समर्पित वृत्तीने जगले पाहिजे. यानंतर प्रमुख अतिथींचा यथोचित सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धेत व क्रीडा प्रकारात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मा. ठोंबरे साहेबांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या एकात्मतेचे दर्शन घडवणाऱ्या गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर केले. पूर्व प्राथमिक विभागातून जय शेजुळ  व माध्यमिक विभागातून अक्षिता बडजाते या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.
   विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. दवंगे सर म्हणाले  की, प्रजासत्ताक दिन हा आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या आणि आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मा. अविनाश शिरसाठ सर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद  करताना सांगितले की, या दिवसाला खूप महत्त्व आहे. कारण तो केवळ ब्रिटिश अधिराज्यातून सार्वभौम प्रजासत्ताक देशाच्या संक्रमणाचे  प्रतीकच नाही, तर आपण आपला समृद्ध संस्कृतीक वारसा, आपल्या विविध परंपरा आणि लोकशाही प्रति आपली बांधिलकी यांचा अभिमान बाळगण्याचा ही दिवस आहे.
    प्रमुख पाहुणे मा. ठोंबरे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की,  २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपवण्यात आली. आपली राज्यघटना आपल्या महान राष्ट्राचा पाया आहे. हे आम्हाला आमचे हक्क आणि स्वातंत्र्य प्रदान करते. आणि हे महान कार्य संविधानाचे शिल्पकार  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.म्हणून त्यांच्या प्रति आपण सदैव कृतज्ञता बाळगली पाहिजे . त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनते पासून दूर राहण्याचेही आवाहन केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. कांतीलालजी अग्रवाल शेठ, विश्वस्त मनोजजी अग्रवाल, व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आदिती घुले व इनाया पठाण या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!